आयडीएट प्रोटो प्रकार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन Arya Gurukul अंबरनाथने पटकावले

Arya Gurukul : अंबरनाथ Arya Gurukul स्कूल आयोजित मंथन फेस्टिवल सफल झाला. दोन दिवसीय लेख, क्राफ्ट आणि सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक मॉडेल बनवून आपली प्रतिभा दाखवली. एग्जीबिशनमध्ये सर्वोत्तम प्रकल्प तयार करणारे विद्यार्थ्‍यांना स्‍कूल मॅनमेंट तर्फे बक्षीस देऊन सन्मानित केले गेले.

कार्यक्रमात कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी अजित दुबे, डॉ. सुजीत नायर, अजुकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.नीलम मलिक आणि सचिव भरत मलिक यांनी विद्यार्थी ट्रॉफीकर उत्साही मनोबल वाढवला. एजुकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित अंबरनाथ आर्य गुरुकुल स्कूल मध्ये 12 आणि 13 ऑगस्ट ला मंथन फेस्टिवल संपन्न झाला. चार स्कूल्स ने यात भाग घेतला होता.

प्रदर्शन थीम या वर्षी होणारी जी-२० शिखर परिषदेवर आधारित होती. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी मॉडेल च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यात रोलिंग ट्रॉफी कल्याण पूर्वच्या सेंट मेरिज हाई स्कूल आणि लिटल आर्यन्स ने जिंकली तर प्रोटो प्रकार श्रेणीमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन आर्य गुरुकुल स्कूल अंबरनाथ ने पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मंथन फेस्टिवल पाहिल्यानंतर भरत मलिक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पवार यांनी सांगितले की मी कार्यक्रमाचा पाहुणा नसून आर्य गुरुकुल परिवाराचा एक सदस्य म्हणून येथे आलो आहे . पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येक पालकाला आपलं मुल यांनी आर्य गुरुकुल मध्ये शिक्षा घ्यावी असं वाटत आहे.

या मंथन फेस्टिवल कार्यक्रमात अमरनाथ आर्य गुरुकुल चे प्रिंसिपल नीलेश राठौड़, गीता नायर, आर्य गुरुकुल कल्याणच्या प्रिंसिपल राधामनी अय्यर, सेंट मेरिज स्कूल कल्याणच्या प्रिंसिपल दिव्या बोरसे सहित तमाम टीचर्सचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul Ambernath won the Best Exhibit in the IDET Prototype category

Watch Exhibition Video
क.डों.म.पा. क्षेत्रातील पदपथांवर सर्रास अतिक्रमणे; पत्रकार धमकी प्रकरणी तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.

विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.

संतोष दिवाडकर

Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association

तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया

Maval News : चौदा वर्षीय मुलगा शंभू ठाकर हरवल्याने तालुक्यात उडाली होती खळबळ

Maval News : मावळ तालुक्यात आज दिवसभर एक व्हॉट्सऍप स्टेटस पहायला मिळत होता. तो म्हणजे शंभू ठाकर हरवला आहे सापडल्यास संपर्क करावा. जवळपास संपूर्ण तालुक्यात या स्टेटसने शंभूला व्हायरल केले होते. चिंतेत असलेल्या मावळ तालुक्याने संध्याकाळी मोकळा श्वास घेतला तो म्हणजे शंभू पुन्हा सुखरूप घरी परतल्याच्या बातमीने.

मावळ तालुक्यातील येळसे गावातील शंभू गणेश ठाकर हा नववीत शिकणारा १४ वर्षीय मुलगा सकाळीच रागाने घर सोडून निघून गेला होता. अभ्यासावरून वडिलांनी खडसावले म्हणून शंभूने हे पाऊल उचलल्याचे समजते. शंभूला रागावून त्याचे वडील गणेश ठाकर हे एका विधी कार्यासाठी घरातून बाहेर पडले. आणि त्यापाठोपाठच एक दुचाकी वाहन घेऊन शंभू देखील बाहेर पडला. ही माहिती समजल्यानंतर शंभूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी चिंतेत आले आणि लगोलग शोधमोहीम सुरू झाली.

तळेगाव मध्ये शाळेत शिकत असलेला शंभू दुचाकी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला असल्याचे लोणावळा येथील वर्सोली टोलनाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते. यानंतर मात्र संपूर्ण तालुक्यात समाज माध्यमांच्या माध्यमातून शंभूची शोधमोहीम सुरू झाली होती. सकाळी पावणे दहा वाजता तो टोलनाका सोडून पुढे गेला असल्याने तो कदाचित कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागात जाऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

दुपार नंतर सदर माहिती मुंबई भागात देखील पोहोचू लागली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी बराच शोध घेतल्यानंतर तो त्यांना लोणावळा येथे मिळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता तो लोणावळ्यातच फिरत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर मात्र शंभूला सुखरूपपणे घरी आणले आणि त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याने समाधानकारक निश्वास टाकला.

संतोष दिवाडकर

Maval News : Concern spread in Maval due to the missing of fourteen-year-old boy Shambhu Thakar

नांदीवली Aarya Gurukul School मध्ये गायत्री हवन

Aarya Gurukul School : दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी, नांदिवली येथील सर्वोत्कृष्ट CBSE शाळा असलेल्या आर्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅम्पसमध्ये गायत्री हवन केले. विद्यार्थी, शिक्षक आणि आर्य गुरुकुलच्या व्यवस्थापन संघाने एकत्रितपणे हवन केले.

गायत्री हवनाचे महत्त्व असे आहे की गायत्री, सावित्री आणि सरस्वती या तीन देवतांचे प्रतीक असलेल्या देवी गायत्रीचे स्मरण केले जाते. गायत्री ही इंद्रियाची स्वामी आहे, सावित्री ही थ्रुथ आणि सरस्वती ही वाणीची देवी आहे.

गायत्री मंत्र हा आपल्या सर्व इंद्रियांना पोषण आणि बळकट करणारा सर्वसमावेशक मंत्र आहे. आपली बुद्धी तीक्ष्ण करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. गायत्री हवनाच्या वेळी होम (अग्नी) समोर गायत्री मंत्राचा जप केला जातो. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला गायत्री हवन हा एक सुंदर क्षण पाहण्याजोगा होता. विद्यार्थ्यांनी मंत्राचा उच्चार करून शाळेचे वातावरण बदलून टाकले.

शाळा व्यवस्थापनाचे समर्पण दिसून आले आणि त्यांनी मनापासून हवन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. गायत्री हवन आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंकडे आपली उर्जा प्रवाहित करते – बुद्धिमत्ता, सौंदर्य, वाणी, आरोग्य जे आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्ण कल्याणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रतिबिंबित करते.

आर्य गुरुकुल ही चिन्मय मिशन शाळा आहे आणि आपल्या परंपरेचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात सतत विचारपूर्वक कार्यक्रम आणि उत्सवांद्वारे प्रबळ करते.

संतोष दिवाडकर

Gayatri Havan at Nandivali Aarya Gurukul School

Kalyan Crime News : संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाने पोलिसांसमोरच दाखवला माध्यमांना माज

Kalyan Crime News : कल्याण पूर्वेत बुधवारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्नात कोळसेवाडी पोलिसांनी एका नराधमाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले होते. याचवेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी या प्रसंगाचे चित्रीकरण सुरू केले. मात्र संतापजनक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीने चक्क पोलीसांच्या समोरच माध्यमांच्या केमेऱ्याकडे दोन बोटे दाखवून विक्टरी म्हणजेच विजयाची खून केली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणी वरून आपल्या घरी जात असताना विशाल गवळी नामक इसमाने तिचा पाठलाग करून तिला भर रस्त्यात अडवले. यानंतर तिला रस्त्याकडेला नेले व तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. भयभीत झालेल्या मुलीने त्याचा प्रतिकार केला आणि ती निसटून घरी आली. यानंतर तिच्या घरच्यांनी थेट कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तासाभरातच नराधम आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्थानकात हजर केले.

अटकेत असलेल्या आरोपीचे चित्रीकरण करणाऱ्या प्रतिनिधींना या नराधमाने चक्क पोलिसांच्या समोरच दोन बोट दाखवून संतापजनक कृत्य केले. त्याने असे कृत्य करताच पोलिसांनी त्याचा हात झटकरला. यामुळे याला कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. केलेल्या दुष्कृत्याचा जराही पश्चाताप या नराधमाला झाला नसून आता तो पोलिसांच्या तावडीत आहे.

आरोपी विशाल गवळीवर या अगोदरही बलात्कार तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून त्याच्यावर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली होती. आता त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्याला पोलीसी खाक्या दाखवावा असे लोकांमार्फत बोलले जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Crime News : Attempt to rape a minor girl in Kalyan East

ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ?

Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.

केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.

कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.

चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.

महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party

आर्य गुरुकुल शाळेत जागतिक योग दिवस साजरा

कल्याण : एज्युकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित नांदिवली स्थित आर्या गुरुकुल शाळेत २१ जून २०२३ रोजी योग सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालक, शिक्षक, योगप्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम बुधवारी सकाळी ठीक ७:४५ ते १०:०० या वेळेत संपन्न झाला. सीबीएससी ने पुरवलेल्या प्रोटोकॉल नुसार प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. पालकांना व विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी यात दिली गेली.

आर्या गुरुकुलच्या एक महाराष्ट्र नवनिर्मित व एक एयर एस क्यू एन, एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच ऑनलाइन योगाचे आठ दिवसाचे शिबिर घेण्यात आले. व ऑनलाईन पद्धतीने पालकांचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन योगासन शिबिर घेण्यात आले.

इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा योगासने केली व योगसनाची कृती फायदे व लाभ सांगितले. तसेच योग या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग सुद्धा बनवलेले आहेत. शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन योग दिवस अगदी यशस्वी पद्धतीने साजरा केला गेला.

या प्रसंगी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी संकल्प केला की मी स्वतः एक स्वास्थ शांतिप्रिय आनंद पूर्ण मनुष्य बनवण्याची संकल्पना करतो. माझ्या प्रत्येक कार्यातून विचारही बाजूंना शांती व स्नेहपूर्ण वातावरण बनवण्याचा व पूर्ण जगाला आपल्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीन. आर्या गुरुकुलचे संस्थापक श्रीयुत भरत मलिक सर म्हटले आमचा विश्वास आहे की योगा हे जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे आपण सर्व भेद व सीमा विसरून पूर्ण जग एकत्र करू शकतो .या कार्यक्रमादरम्यान आर्या गुरुकुलच्या चिन्मय सरगम द्वारा रचित व गायलेले गीतेची ध्वनी चालू होती या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली.

संतोष दिवाडकर

World Yoga Day celebrated at Arya Gurukul School