Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development

Shivsena : डोंबिवलीत पार पडली शिवसेनेची महत्त्वाची बैठक

Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेत शिंदे की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये आपापसात वादावादी आणि गैरसमज नको म्हणून आज डोंबिवलीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पार पडलेल्या बैठकीच्या वेळी कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जे काही सुरु आहे. विशेषत: शिवसेनेत जे काही चालले आहे. बंडखोरी झालेली असून आम्ही शिवसेनेतच आहोत असे सर्व म्हणत आहेत. या बाबतीत कायदेशीर लढाई सुरु झालेली आहे. निश्चीतपणे त्या बाबतीत जो काही निर्णय लागेल, जो काही पक्षाचा आदेश येईल. त्या प्रमाणे शिवसैनिक काम करतील. मात्र शिवसैनिकांमध्ये गैरसमज आणि आपापसात वादावादी होऊ नये. सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर यावी यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचेही लांडगे म्हणाले.

एका शिंदे समर्थकाला शिवसैनिकांनी चोप दिल्याची घटना घडली असल्याविषयी लांडगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, असा काही एक प्रकार घडलेला नाही. कपोलकल्पीत काही घडवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. अशा राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत का? अशी विचारणा लांडगे यांना केली असता त्यांनी सांगितले की, मुंबई पासून कर्जत, अलिबाग एमएमआर रिजनमध्ये बैठका सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीला येण्याचे तूर्तास तरी नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

Shivsena: An important meeting of Shivsena was held in Dombivali

Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी ३५ हुन अधिक आमदारांसह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून बंड पुकारणारे सर्व आमदार राज्याबाहेर गुवाहाटी येथे थांबले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती मान्य नसल्याचे या बंडातून सांगितले जात आहे. मात्र यावरून शिवसैनिक आता महाराष्ट्र भरात आक्रमक होताना दिसत आहेत.

ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचा एक समज आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालय शनिवारी फोडण्यात आल्या नंतर पोलिसांनी आता अधिक गंभीर भूमिका घेतली असून राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून ठाणे ग्रामीण भागात ३० जून पर्यंत तर मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

Shivsena: MP Shrikant Shinde’s office vandalized by shivsainik