कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials

सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

डोंबिवली : आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांना आवर्जून मतदान करणे गरजेचे असल्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी नेते सुनील देवधर यांनी केले आहे.

ब्राह्मण सभेत जमलेल्या हजारो ब्राह्मण मंडळींनी चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा सामूहिक निर्णय यावेळी घेतला. ब्राह्मण सभेत संपन्न झालेल्या सकल ब्राह्मण समाज मेळाव्यामध्ये सर्वानुमते तसे ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आयोजित सभेत भाजपलाच का मतदान द्यावे याबाबत देवधर यांनी जनजागृती केली. अर्थतज्ञ फडणीस यांनीही आपले विचार मांडले तसेच मोदीच का या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या १०१ कारणांपैकी काहींचा उल्लेख करून त्यांनी हिंदुत्व पटवून दिले.

मंत्री चव्हाण यांनी शहरातील अपप्रवृत्ती कशा वाढल्या होत्या, त्या समूळ नष्ट करायला किती वेळ गेला याबाबत उदाहरण देऊन माध्यमांनी जे लिहायला हवे ते परखड शब्दांत मांडले. शहरातील सर्व ब्राह्मण समाजाचे पदाधिकाऱ्यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळते, त्यांचा मी ऋणी आहे असेही ते म्हणाले. यावेळी माधव घुले, प्रदीप जोशी, जे के जोशी, मनीषा धोपटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी, पद्माकर कुलकर्णी, सप्तर्षी, श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष अलका मुतालिक, ऍड वृन्दा कुलकर्णी, ब्राह्मण सभा अध्यक्ष राहुल दामले, संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे, मधुकर कुलकर्णी, शशांक खैर, अमरेंद्र पटवर्धन, गौरी खुंटे, शमा भाट्ये, यांसह हजारो ब्राह्मण मंडळी उपस्थित होती.

Unconditional support of the entire Brahmin community to Ravindra Chavan

डोंबिवली मधील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न; मंत्री Ravindra Chavan यांनी केलं संबोधित

Ravindra Chavan : रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री Ravindra Chavan यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला. निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Minister Ravindra Chavan delivered a speech