कल्याण अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता? दोन गटांत रंगलं राजकारण

विशाल गवळी : मागील काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे. विशाल गवळी नावाच्या विकृतीने कल्याण पूर्वेतील एका नाबालीके चे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीवर अत्याचार केले गेल्याचे सांगत शहरात निदर्शने देखील करण्यात आली. सदर आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याच विशाल गवळीवरून आता या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले महेश गायकवाड यांनी हा आरोपी व त्याचे कुटुंबीय भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी काही फोटो व्हिडिओ देखील पुरावे म्हणून माध्यमांसमोर सादर केले. मात्र भाजपने या सर्व आरोपांचे खंडन करून हा आमचा कार्यकर्ता नव्हता असे स्पष्टपणे सांगितले असून त्यांनी हा आरोपी महेश गायकवाड यांचाच असल्याचा पलटवार करीत एका फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट माध्यमांसमोर दाखवला आहे. मात्र याच स्क्रीनशॉटवर आता नानाविध सवाल उपस्थित केले जात आहेत.

भाजपने सादर केलेला स्क्रीनशॉट हा विशाल गवळीने निवडणुकीत केलेली पोस्ट असल्याचा दावा केला आहे. या पोस्टमध्ये महेश गायकवाड यांना आमदार करा असे आवाहन गवळी याने केल्याचे दिसत आहे. मात्र त्याचबरोबर या पोस्टचा स्क्रीनशॉट 13 मिनिटानंतर घेतल्याचे देखील स्क्रीनशॉट मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट लगेचच 13 व्या मिनिटाला कशासाठी घेण्यात आला? सदर पोस्ट ही नेमकी कधी केली गेली आहे? सदर व्यक्तीचे प्रोफाईल आयडी काय आहे? याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सदर पोस्टचा स्क्रीनशॉट चर्चेत आला असून तो खरा की बनावट यासाठी सदर पोस्टची तपासणी करावी लागणार आहे.

विशाल गवळी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी म्हटले आहे. तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई होईल याची शाश्वती नसल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी विशाल गवळी कुणाचा माणूस? यावर शहरात राजकीय ढकलफेक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घडलेली घटना अत्यंत गंभीर असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी आशा मात्र कल्याणकरांना लागून आहे.

Vishal Gawli in the torture case of which party?

KDMC News : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली

KDMC News : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती. 4 जे प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाई नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून तक्रारदारांचा निषेध व्यक्त केला होता. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचे समोर आले आहे. परंतु ही बदली कारवाईमुळे झाली नसून महापालिकेच्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता मनसे शाखेसमोरील पत्र्याचे शेड तोडणे महापालिकेला जास्त महत्त्वाचे वाटते का? असा सवाल मनसे पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळींनी आकसापोटी महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत मनसेने शाखेसमोरील रस्त्यालगत एक भलेमोठे होर्डिंग्ज लावले होते. ज्यात ‘कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’ असा राज ठाकरेंच्या विधानाचा मजकूर लिहलेला होता. तक्रादारांच्या डोळ्यावरची सत्तेची झापड उतरविण्यासाठी आम्ही बॅनर लावला असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी 4 जे प्रभाग क्षेत्राच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची 5 ड प्रभाग क्षेत्रात बदली केली आहे. तर 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त पदी सचिन तामखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत 5 ड प्रभाग क्षेत्राचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यावर सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनसे शेडबाहेरील पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही प्राप्त तक्रारीनुसार करण्यात आली होती. झालेल्या बदल्या या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी करण्यात आल्या असल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

KDMC News : Transfer of Assistant Commissioner who took action on shed in front of MNS branch

Dombivli Dahihandi : यंदा दीपेश म्हात्रे रिक्षाचालकांना देणार दहीहंडी फोडण्याचा मान

Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहीहंडी महोत्सवाच्या संध्याकाळी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. तसेच प्रसिद्ध युट्युबर विनायक माळी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असून ते सर्वांसाठी खुले असणार आहे. द्वितीय पारितोषिक देखील एक लाख रुपये असून ते मात्र डोंबिवलीतील मंडळांसाठीच आरक्षित असेल. 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता कृष्ण जन्मोत्सव पारंपरिक भजनांच्या माध्यमातून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरी, या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडीचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा, असे दीपेश म्हात्रे फाउंडेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सण उत्सवात विविध पक्ष रस्त्यावर कमानी उभ्या करतात, मोठमोठे होर्डिंग्ज आणि बॅनर लावतात. सध्या रस्त्यांची सर्वत्र दुरावस्था झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कमानी उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका असा संदेश दीपेश म्हात्रे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

Dombivli Dahihandi : This year Dipesh Mhatre will give the honor of breaking Dahihandi to the rickshaw drivers

Kalyan East : शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून शाळकरी विद्यार्थ्याने घेतला गळफास

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने एका शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून ठेवले होते.

विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आई वडीलांसह राहत होता. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. रविवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने एक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. एका शिक्षिकीने व विद्यार्थ्याने मला चिडवल्याने आत्महत्या करीत असल्याचे या नोट मध्ये लिहण्यात आले आहे. मात्र त्याच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलिकडल्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी मानसिक तणावातून आत्महत्या केली जाते हे प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील तितकाच समावेश होतो. यामध्ये आत्महत्या करण्यामागे काही गंभीर कारणे असतात तर काही प्रकरणात शुल्लक कारणाने आपले जीवन संपवल्याचे देखील समोर येते. त्यामुळे अशा विषयांवर शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे असे दिसते. त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घ्यायला हव्यात ही काळाची गरज बनू लागली आहे.

Kalyan East : A school student hanged himself after writing the name of the student along with the teacher

डोंबिवली गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी युवा उद्योजकाने दिली ३० किलो चांदीची वीट

डोंबिवली : शहराचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या गणेश मंदिराची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता या डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा जीर्णोद्धार केला जाणार असून मोठ्या प्रमाणात चांदी लागणार आहे. याकरिता अनेक दानशूरांना आवाहन केले जात आहे. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर नांदेड मधील एका युवा उद्योजकाने आज बाप्पा चरणी ३० किलो ९०० ग्रॅम वजनी चांदीची वीट अर्पण केली आहे.

डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर चांदी लागेल अशी माहिती दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी नांदेडचे युवा उद्योजक सुमित मोगरे यांच्याशी संपर्क केला होता. यानंतर चव्हाण यांच्या शब्दाला मान देत सुमित यांनी तात्काळ चांदी दान देण्याचे ठरविले. आज सकाळच्या दरम्यान मंदिरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी चांदीची वीट गणरायाच्या चरणी अर्पण केली. या विटेची किंमत साधारणपणे २७ लाख २७ हजार रुपयांच्या घरात आहे.

युवा उद्योजक सुमित मोगरे यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे. त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी २ कोटी ४० लाख रुपयांची चांदी अर्पण केली होती. त्यापाठोपाठ त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डोंबिवलीच्या गणेश मंदिरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी दान केली आहे. असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोगरे यांचे आभार व्यक्त केले.

A young entrepreneur donated 30 kg of silver brick for the renovation of Dombivli Ganesh Temple

Kalyan East भागात हायटेक सेमी इंग्लिश स्कुल उभारण्याची मागणी

Kalyan East : दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची घटती पटसंख्या, शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे, शाळांची झालेली दुरावस्था तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्व महापालिकेच्या शाळा या सेमिइंग्लिश करणे बाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नुकतीच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली.

Kalyan East भागात मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक राहत असून इंग्रजी शाळेत आकारण्यात येणारी भरमसाठ फी व डोनेशन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडणारे नाही. कल्याण पूर्वेत नेतीवली येथे महापालिकेच्या मालकीची केवळ एकमेव सेमीइंग्लिश शाळा आहे. मात्र ती शहराच्या एका वेगळ्या टोकाला असल्याने कल्याण पूर्वेच्या मध्यभागी असलेल्या काटेमानिवली शाळा व जाईबाई शाळा येथे तातडीने सेमीइंग्लिश स्कुल सुरू करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.

अलीकडल्या काळात काटेमानिवली येथील शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे नव्याने सुसज्ज ईमारत बांधून कल्याण पूर्वेतील मुलांसाठी सर्व सोयीसुविधा असलेली हायटेक सेमी इंग्लिश स्कुल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नितीन निकम यांनी आयुक्तांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास शिंदे देखील उपस्थित होते.

Demand for establishment of Hi-Tech Semi English School in Kalyan East area

Kalyan East : कल्याण पूर्व विधानसभेसाठी प्रथम दावा भाजपचाच असेल – मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा पेच आता वाढू लागला आहे. मात्र कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेची जागा ही भाजपच लढवेल असे आता म्हटले आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे स्थानिक आमदार असून मागील १५ वर्षे ३ टर्म त्यांनी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. गोळीबार प्रकरणा नंतर ते तुरुंगात असल्यानंतर आता कल्याण पूर्वेत सत्तापालट होणार का? अशा चर्चा सुरू होत अनेकांची नावे पुढे येऊ लागली. त्यानंतर हा विधानसभा क्षेत्र शिवसेनेला देऊन कल्याण पश्चिमचा भाजपला दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही जागा भाजपचे लढवेल असे सांगितल्यानंतर आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणपत गायकवाड हे वर्षानुवर्षे या भागाचे नेतृत्व करीत आलेले आहेत. ते सातत्याने निवडूनही येतात. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले आहे. ते येथील विद्यमान आमदार असल्याने महायुतीत या ठिकाणी प्रथम दावा हा भाजपचाच असेल. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणे हे गैर नाही त्याचप्रमाणे दावे करणे देखील बरोबरच आहे असे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Kalyan East : BJP’s first claim for Kalyan East Assembly will be – Minister Ravindra Chavan

भाजप पसरतंय अंथरून सोडून पाय; पाच जागांवर दावा, मग बाकीच्यांना काय?

कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात रस्सीखेच सुरु झाली असताना कल्याणमध्ये भाजपने खळबळजनक दावा केला आहे. कल्याण मध्ये भाजपाने पाच जागांवर दावा केला असून आमचे तुल्यबळ जास्त असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. यामुळे युतीत असलेल्या भाजपाने हेतुपरस्सर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथे भाजपाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ या पाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून इथे भाजपचे उमेदवार द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी आहे की अंथरून पसरून पाय पसरणे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा मजबूत असल्याचा दावा केला आहे. या पाच पैकी डोंबिवली, कल्याण पूर्व या दोन मतदारसंघात भाजप, कल्याण पश्चिम, अंबरनाथमध्ये शिवसेना तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचा उमेदवार असून या पाचही मतदारसंघात सूर्यवंशी यांनी भाजपचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात येत असून अनेक ठिकाणी शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी असे दावे करणे म्हणजे अंथरून सोडून पाय पसरणेच आहे अशा चर्चा देखील केल्या जात आहेत.

BJP claims five seats in Kalyan

Kalyan East : गणेशवाडीतील गीता हरिकीसनदास रुग्णालयात लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची होतेय मागणी

Kalyan East : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणेशवाडी येथे महानगरपालिकेचे गीता हरीकिसनदास हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ओ.पी.डी. आणि कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र सुरू आहे. याजागी लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक ९२, गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुलातील भूखंड हा सांस्कृतिक भवनाकरिता आरक्षित आहे. मात्र या भूखंडावर महात्मा फुले योजने अंतर्गत व इतर शासकीय योजने अंतर्गत सर्व आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून आरक्षण बदलण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. सदर भूखंडावर असलेल्या इमारतीत रुग्णालयाचे काम करण्यात आलेले आहे. मात्र आरक्षण बदल होईपर्यंत याठिकाणी महिलांसाठी प्रसृतिगृह तसेच गीता हरिकीसनदास रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयीसुविधा याठिकाणी हलविण्यात याव्यात याबाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शक्तीधाम येथील इमारतीत १५ ऑगस्ट पर्यंत तातडीने प्रसृतिगृह उभारून गीता हरिकीसनदास रुग्णालय लहान मुलांसाठी सुसज्ज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचे नितीन निकम यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड देखील उपस्थित होते.

Demand for setting up a well-equipped children’s hospital at Geetha Harikisandas Hospital in Ganeshwadi

Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंजिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल.

आप्पा शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)

________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)

_____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते.” –उदय रसाळ (माजी नगरसेवक)

____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे.”शाहीन मुल्ला (समाजसेविका)

Kalyan News : KDMC ‘D’ ward area is still a haven for addicts