भाजप पसरतंय अंथरून सोडून पाय; पाच जागांवर दावा, मग बाकीच्यांना काय?

कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात रस्सीखेच सुरु झाली असताना कल्याणमध्ये भाजपने खळबळजनक दावा केला आहे. कल्याण मध्ये भाजपाने पाच जागांवर दावा केला असून आमचे तुल्यबळ जास्त असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. यामुळे युतीत असलेल्या भाजपाने हेतुपरस्सर शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथे भाजपाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ या पाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून इथे भाजपचे उमेदवार द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी आहे की अंथरून पसरून पाय पसरणे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा मजबूत असल्याचा दावा केला आहे. या पाच पैकी डोंबिवली, कल्याण पूर्व या दोन मतदारसंघात भाजप, कल्याण पश्चिम, अंबरनाथमध्ये शिवसेना तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचा उमेदवार असून या पाचही मतदारसंघात सूर्यवंशी यांनी भाजपचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात येत असून अनेक ठिकाणी शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी असे दावे करणे म्हणजे अंथरून सोडून पाय पसरणेच आहे अशा चर्चा देखील केल्या जात आहेत.

BJP claims five seats in Kalyan

Kalyan East : गणेशवाडीतील गीता हरिकीसनदास रुग्णालयात लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची होतेय मागणी

Kalyan East : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणेशवाडी येथे महानगरपालिकेचे गीता हरीकिसनदास हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ओ.पी.डी. आणि कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र सुरू आहे. याजागी लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक ९२, गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुलातील भूखंड हा सांस्कृतिक भवनाकरिता आरक्षित आहे. मात्र या भूखंडावर महात्मा फुले योजने अंतर्गत व इतर शासकीय योजने अंतर्गत सर्व आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून आरक्षण बदलण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. सदर भूखंडावर असलेल्या इमारतीत रुग्णालयाचे काम करण्यात आलेले आहे. मात्र आरक्षण बदल होईपर्यंत याठिकाणी महिलांसाठी प्रसृतिगृह तसेच गीता हरिकीसनदास रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयीसुविधा याठिकाणी हलविण्यात याव्यात याबाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शक्तीधाम येथील इमारतीत १५ ऑगस्ट पर्यंत तातडीने प्रसृतिगृह उभारून गीता हरिकीसनदास रुग्णालय लहान मुलांसाठी सुसज्ज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचे नितीन निकम यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड देखील उपस्थित होते.

Demand for setting up a well-equipped children’s hospital at Geetha Harikisandas Hospital in Ganeshwadi

Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंजिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल.

आप्पा शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)

________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)

_____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते.” –उदय रसाळ (माजी नगरसेवक)

____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे.”शाहीन मुल्ला (समाजसेविका)

Kalyan News : KDMC ‘D’ ward area is still a haven for addicts

Arya Global ग्रुपने साजरा केला ‘ग्लोबल वेलनेस डे’

Arya Global : डॉ नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल, आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम राबवित असते. आयोजित उपक्रमात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांची पालकत्वावर चर्चा आयोजित केली गेली.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक, डॉ. हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केले होते. आपल्या विचारप्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉ. शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या. अधिक स्क्रीन वेळ, अस्वास्थ्यकर अन्न सवयी, एकटेपणा, विभक्त कुटुंबे यासारख्या समस्यांना स्पर्श केला गेला.

डॉ. शेट्टी यांनी लवचिकता, नातेसंबंध, दुरुस्ती आणि निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग कसा असावा याबद्दल सांगितले. पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकतात आणि तरीही घरात निरोगी वातावरण कसे तयार केले जाऊ शकते हे सांगितले.

या कार्यक्रमाला डॉ. इंदुरानी जाखड IAS, आयुक्त आणि प्रशासक, KDMC या देखील उपस्थित होत्या.आर्य ग्लोबल समुहाकडे इनहाऊस समुपदेशकांचे (Counsellors) एक पॅनेल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतात. प्रोजेक्ट मानवतावादी, सेवा आणि मूल्य शिक्षण यासारखे सकारात्मक शालेय वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ते शाळेत नियमितपणे अनेक उपक्रम राबवतात जे मानसिक आणि भावनिक कल्याण, आत्म-शोध, सर्वसमावेशक वातावरण आणि सहानुभूतीपूर्ण व्यक्ती निर्माण करण्यास मदत करतात.

आर्य गुरुकुल, नांदिवली, अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल, कल्याणच्या समुपदेशकांनी (Counsellors) त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शालेय स्तरावर समुपदेशन प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अलीकडच्या काळात समुपदेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे केस स्टडी देखील शेअर केले.

क्रीडा विभागाने देखील सांगितले की ते कसे सक्रियपणे खेळांच्या माध्यमातून मुलाच्या आरोग्याच्या एकूण संतुलनास प्रोत्साहन देतात. तसेच त्यांनी वेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (𝙳𝚒𝚏𝚏𝚎𝚛𝚎𝚗𝚝𝚕𝚢 𝚊𝚋𝚕𝚎𝚍 𝚜𝚝𝚞𝚍𝚎𝚗𝚝𝚜) मार्ग उघडून सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन दिले गेले.

लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले, “लर्निंग डिसॅबिलिटी हा प्रचलित परीक्षा पद्धतीचा प्रश्न आहे, मुलाचा नाही.” डॉ. इंदुरानी जाखड यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणांचा कसा फायदा होऊ शकतो कारण ही प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहे. जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त म्हणजे इको सिस्टीम तयार करण्याचे स्मरणपत्र आहे, जिथे एखाद्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल उघड करणे सुरक्षित वाटते, जिथे भावनिक गोंधळातून जाण्याचा कोणताही निर्णय किंवा कलंक नाही, जिथे आवाज ऐकला जातो आणि जिथे सर्वसमावेशकता केवळ एकच नाही. खोटी कल्पना पण वास्तव ठरते.

Arya Global Group celebrates ‘Global Wellness Day’

Kalyan Loksabha : मोदींच्या सभेपुर्वी शिवसेनेच्या कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे ना-राजीनामा

Kalyan Loksabha : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण शहरात जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेपुर्वी शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मोदींच्या सभेवरून मोरे हे नाराज असल्याचे त्यांच्या राजीनाम्यातुन स्पष्ट होत आहे.

शिवसेनेच्या बंडानंतर सुरुवातीला अरविंद मोरे हे ठाकरे गटात होते. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची कल्याण मुरबाड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. पदनियुक्तीनंतर ते मिळालेली जबाबदारी पार पाडत होते. मात्र आता मोदींच्या सभेपुर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जिल्हाप्रमुख या पदाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मान प्राप्त करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेकरिता आमदार, माजी आमदार तसेच पक्षाचे शहरप्रमुख यांना मंचावर निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या प्रोटोकॉलनुसार जिल्हाप्रमुखालाही हा मान मिळायला हवा होता. यात माझे नाव जाणीवपूर्वक डावलले असल्याने मी या पदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. नरेंद्र मोदी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील, कल्याणचे डॉ.श्रीकांत शिंदे व ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभा घेत असून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्याच्या चर्चा कल्याणच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Kalyan Loksabha : Shiv Sena’s Kalyan Murbad District Chief Resigns to Chief Minister Ahead of Modi’s Meeting

Kalyan Loksabha : कल्याण पूर्वेत आज शिंदे-दरेकर आमने सामने; एकाच दिवशी प्रचार रॅली

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराच्या फेऱ्या झडत असून कळवा ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली सुरू आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना कल्याण लोकसभेत रंगला असून शिवसेनेकडून डॉ.श्रीकांत शिंदे व उबाठा पक्षाकडून वैशाली दरेकर हे उमेदवार लढत देत आहेत. योगायोगाची बाब म्हणजे आज कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी एकाच वेळी हे दोन्ही उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली दुपारी ४ वाजल्या पासून श्री राम टॉकीज येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग अपर्णा डेअरी, खडेगोळवली नाला, रायगड कॉलनी, आंबेडकर चौक ६० फुटी रोड, शिवाजी महाराज चौक, राजाराम चौक, चिंचपाडा रोड, काटेमानिवली चौक, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, नेतीवली रोड, चक्कीनाका असा असणार आहे.

शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली सायंकाळी ५ वाजता साईनगर शिवसेना शाखेपासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग पुणे लिंक रोड, काटेमानिवली, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, सुमेरू टॉवर पासून पुढे एका विकासकाच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा सांगता होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा मार्ग हा जवळपास एकच असल्याने दोन्ही रॅली या आमने सामने नव्हे तर मागे पुढे असणार आहेत. एक वेळ एक मार्गिका असल्याने समन्वय कसा साधला जातो हे आता पहावे लागणार आहे.

कल्याण पूर्वेचा बराचसा भाग हा अतिशय कोंडीचा असल्याने या भागातील रस्ते देखील अरुंद आहेत. यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना कल्याण पूर्वेतील नागरिकांना सहन करावा लागतो. त्यात आता दोन्ही उमेदवार एकाच दिवशी एकाच वेळी या रस्त्यांवर शक्ती प्रदर्शनासाठी उतरणार असल्याने हे रस्ते देखील कोंडीत सापडणार आहेत. परिणामी परिसरातील नागरिक, तसेच लगीन खरेदीसाठी तसेच इतर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या खरेदीदारांना मात्र मोठ्या जाचाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्की.

-संतोष दिवाडकर 8767948054

Kalyan Loksabha : Shinde-Darekar face off today in Kalyan East

Lagnachya goshti : लग्न पहावे करून; भाग पहिला

Lagnachya goshti : लग्न पहावे करून… यंदा कर्तव्य आहे… जुळल्या रेशीमगाठी… असल्या ओळी आता हमखास वाचायला मिळत आहे. शहरातील गल्लोगल्ली व गावातील वाडीवाडीत लग्न समारंभाचे सूर ऐकायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हीच वेळ योग्य आहे लग्नावर लिहण्याची. बरेच दिवस हे डोक्यात घोंगवणारे विचार लिहायला मोकळीक मिळत नव्हती. म्हटलं आता थोडा वेळ काढुच आणि मग केली ही सुरुवात.

या नव्या लेख मालिकेतून मला आधुनिक लग्न समारंभाविषयी सांगायचे आहे. तसे विषय बरेच आहेत. जसे की लग्नाची ठरवा ठरव, बस्ता, पत्रिका, मानपान, भोजन समारंभ, पाहुण्यांचे रुसवे फुगवे, वरातीचा घाट, पूजा, जागरण गोंधळ आणि पुढचे काही दिवस. यातील प्रत्येक मुद्द्यावर मी निश्चितपणे बोलणार आहे.

दोन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात अनुभव घेऊनच पुढे इतरांच्या लग्नातील सावळे गोंधळ सांगणार आहे. सुरुवात करायची झाली तर बघा बघी पासून. मुळात कोणत्याही लग्नाचा हा मुख्य पाया असतो. हा जर नीट नसेल तर त्या दोघांचे संपूर्ण आयुष्य हे तडजोड करण्यातच जातं. ज्यात सुखाचा शोध शोधून शोधून घ्यावा लागतो.

फार पूर्वी प्रेमविवाह म्हणजे गैर मानले जात होते. थोडक्यात पालकांना नाक कापले गेल्याचा आविर्भाव होत असे. आज हाच आविर्भाव अभिमान बनला आहे. आमक्या आमक्याच्या पोराने पोरगी पटकावली. तुमच्या पोराला काय जमत का नाय? किंबहूना आता पालक आपल्या मुलालाच म्हणतात की तुला मुलगी शोधता नाही येत का? की ते आता आम्हीच बघायचं? आता या प्रेमविवाहाच्या गोष्टी झाल्या. ज्या अजूनही काही घरांमध्ये मान्य नाहीत. जग काय म्हणेल? या एका प्रश्नामुळे कित्येक पालक आपल्या मुलांचे सुख हिरावून घेतात. तर काही मुलं घरातून पळून जाणे पसंद करतात.

पालकांना एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. देवाधिकानी देखील प्रेम केले आहे. यात गैर काय आहे ? शेवटी काय तर आयुष्याच्या जोडीदाराची निवडच ती. उगाच तुम्ही ठरवून दिलेल्या लग्नाचा मागे लागता आणि मुलांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता. यामुळे होत असे की, ठरवून केलेलं लग्न हे यशस्वी होत की नाही हे सांगू शकत नाही. काही वेळेस मुलाला मुलीचे वागणे पटत नाही, मुलीला मुलाचा स्वभाव पटत नाही. काही वेळेस शांत स्वभावाच्या मुलाला नखाने ओरबाडून मांजरी सारखी चवताळणारी बायको मिळते. तर कधी गरीब गाई मुलीला दारुडा आणि मारझोड करणारा अन्यायकारी नवरा मिळतो. आणि मग पुढे काही दिवस घरच्यांच्या बैठका, वोर्निंग लेटर, सोडचिठ्ठया, भांडण, खर्चाची मागामाग असे खूप काही कुटाने होतात. पण हे तेव्हाच जेव्हा त्रास सहन करायची तयारी नसते.

आई वडिलांना त्रास नको म्हणून कित्येक लेकीबाळींनी नवऱ्याचा व सासरच्या लोकांचा जाच सहन केला आहे. बापाकडे फुलाप्रमाणे आयुष्य जगलेली मुलगी सासरी आल्यावर अक्षरशः पायपुसन देखील बनली आहे. हे समाजातील भीषण वास्तव्य आहे. परिस्थिती आज ना उद्या बदलेल या एका आशेवर कित्येक संसार अजूनही सुरू आहेत. पण जोपर्यंत पती पत्नी एकमेकांच्या सुखाचा विचार करीत नाहीत तोवर हे संसार कधीच बहरत नाहीत. म्हणून म्हटले की स्थळ शोधन ही लग्नाची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. ही पसंद चुकली तर आयुष्याचा खेळ झाला. पण शेवटी खेळ तर नियतीचा पण आहे. जसं वालाह्याचा वाल्मिक ऋषी होतो तसंच काही.

म्हणजे सांगायचं हे की काही वेळेस पसंद चुकते सुरुवातीची काही वर्षे जाचात जातात पण कुठून तरी आशेची किरण जागी होतात आणि आयुष्याला कलाटणी मिळते. दुःखाचा संसार सुखाचा होतो जेव्हा वेळ चांगली होते. आणि बहुतेक वेळा ही चांगली वेळ आनण आपल्याही हातात असतं. अशा परिस्थितीत आपलं आयुष्य बरबाद झालं हा विचार सोडून आपलं आयुष्य सुंदर होणार आहे हा विचार करून संसाराचा गाडा पुढे हाकत रहावा. असे करणाऱ्याच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस येतात.

मुला मुलीचे लग्न जमवताना अगोदर त्यांच्या सुखाचा विचार केला जावा. कारण फक्त लग्न लावून देणं ही आपली जबाबदारी नाही. तर आपल्या मुलाबाळाचं सुख कशात आहे हे पाहूण आपली खरी जबाबदारी आहे. असो आता लग्न ठरल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी नातेवाईकांमध्ये, शेजारीपाजारी, गावभर पसरते. मग चर्चा सुरू होतात. “हीच जमलं बरं का… कुठं दिली तिला?… बरीच लांब दिली… आता तिकडे कामं जमली तर बरी… अजून चांगलं स्थळ बघायला पाहिजे होतं… पोरगी लय शिकली पण पोराचं शिक्षण कमी आहे… पोर सावळी आहे पण नवरा गोरापान भेटला बुवा… सरकारी नोकरी आहे पोराची… तरी पण नीट चौकशी केली पाहिजे यांनी…” या अशा चर्चा ऐकायला मिळतात.

ऍरेंज मॅरेज… म्हणजेच ठरवून लग्न करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे आमच्या मुला मुलीचे लग्न आमच्याच समाजात किंवा जाती जमातीत करून देण्याचा अट्टहास. मग जातीपुढे आयुष्याची माती का होईना. आम्ही जोखीम उचलायला तयार असतो. जो जातीचा नाही तो या मातीचा नाही अशा फुशारक्या करणारी चार पाच स्वयंघोषित विचारवंत टाळकी पुढे येतात आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा सौदा करून सुपारी फोडून पान चावून कोपऱ्यात घाण करून निघून जातात. यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता ही आहे की यांचे मोठेपण मिरवणे हे कुणाच्या तरी आयुष्याशी खेळ असतो. त्यामुळे आजच्या जगात जाती पाती पाहण्यापेक्षा तुम्ही मुलाचे विचार आणि आपल्या मुलीला तो कसा सुखी ठेऊ शकतो हे पाहण्याकडे प्राधान्य द्या. कारण जात जात करून उद्या जेव्हा संकट येईल तेव्हा कोणी पूढे येत नसतं. त्या संकटाला आपल्यालाच सामोरे जायचे असते. मग जी चार लोक तुमच्या गरजेला उपयोगी पडतील का नाही हे माहीत नाही ते काय म्हणतील या विचाराने मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. जोडीदार निवडताना जात पात विसरा त्या जोडीदाराची गुणवत्ता पहा. सुखाचा संसार होईल अशी खात्री असेल तर द्या हातात हात.

तुमचं लग्न झालं आहे का? ठरलं आहे का? किंवा तुमच्या ऐकण्यात असे काही किस्से असतील तर नक्की कमेन्ट करा. किंवा मला पर्सनल मेसेज करून तुमचं मत नक्की कळवा. जेणेकरून मला हे कळेल की हा लेख कोण कोण वाचत आहे. आणि वाचकांना त्याबद्दल काय वाटते. आता पुढच्या भागात आपण जरा निमंत्रण पत्रिकां बद्दल बोलूयात. तो खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यावर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. पत्रिका ऑनलाइन की ऑफलाइन द्याव्यात यावर व्यक्त होऊयात. वाट पहा… लवकरच पुढील भाग.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार 8767948054)

Lagnachya goshti : Lagna pahave karun; part 1

Arya Global ग्रुप ऑफ स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा

Arya Global : महाराष्ट्र ही स्वप्नांची आणि संधीं प्राप्त करून देणारी भूमी आहे जिथे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय तुम्हाला स्थान मिळवून देऊ शकते. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही तर संस्कृती, भाषा आणि परंपरा यांचे विभिन्न रूप आहे.

Arya Global ग्रुप ऑफ स्कूल्सने 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हे ऐक्य, लवचिकता आणि प्रगतीच्या भावनेचे प्रतीक आहे. जे राज्याच्या अनेक दशकांच्या प्रवासाची व्याख्या करते. महाराष्ट्र दिन 2024 हा कामगार दिन किंवा कामगार दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस संपूर्णपणे आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आला.

आर्य गुरुकुल, अंबरनाथ, नांदिवली आणि सेंट मेरी स्कूल, कल्याण येथे ध्वजारोहण झाले. मुंबईच्या उत्तुंग गगनचुंबी इमारतींपासून ते पश्चिम घाटाच्या निर्मळ भूदृश्यांपर्यंत, महाराष्ट्राने परंपरा, भाषा आणि श्रद्धा यांनी व्यापलेला आहे. हे वाक्य शाळेतील दादांनी आणि माऊशींनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये भाषणे देऊन दिवसाचे महत्त्व सांगितल्यामुळे महाराष्ट्र दिन हा उत्साहाने साजरा झाला. मुख्याध्यापक आर्य गुरुकुल, अंबरनाथ, नीलेश राठोर, मुख्याध्यापक आर्य गुरुकुल नांदिवली, राधामणी अय्यर, मुख्याध्यापिका सेंट मेरी स्कूल दिव्या बोरसे, समन्वयक, शिक्षक व सर्वांच्या उपस्थितीने दिवसाची भव्यता अधिक दृढ झाली.

शिक्षकेतर कर्मचारी, माऊशी आणि दादांच्या आर्यग्लोबल ग्रुपची कामगिरी टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमली. चमकणाऱ्या चेहऱ्यांनी कौतुकास्पद नोट्सची देवाणघेवाण केली कारण प्रेक्षकांनी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर त्यांचे प्रेम आणि आराधना व्यक्त केली. श्रमाचा सन्मान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असले पाहिजे. तो आपल्या स्वभावाचा एक भाग असला पाहिजे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर माऊशी आणि दादांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे झाली. त्यानंतर शिक्षकांनी आमच्या सहाय्यक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्याध्यापकांनी आपल्या प्रेरक भाषणात सर्वांचे हार्दिक स्वागत केले. राज्याबद्दल प्रेमाचे प्रतीक सादर केले आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे आणि आर्यग्लोबल ही शैक्षणिक संस्था सुरळीतपणे चालविण्यात आपल्या लाडक्या माऊशी आणि दादांची महत्त्वाची भूमिका कशी आहे हे सांगितले.

उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या दिनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल कलाकारांचे कौतुक करण्यात आले. तो खरोखर एक आनंददायक प्रसंग होता. सर्वत्र आनंदी चेहरे दिसत होते.

Celebrating Maharashtra Day and Labor Day in Arya Global Group of Schools

प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा Arya Gurukul मध्ये संपन्न

Arya Gurukul : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट (ICPE ) आयोजित
शुंकला ऑर्गनाइज फॉर सस्टेंनेबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने पूस्मा आणि आर्य ग्लोबल यांच्या पुढाकाराने Arya Gurukul नांदीवली येथे
प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा 2024 पार पडला.

पुस्मा आणि आर्य ग्लोबल तर्फे 3 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कल्याण डोंबिवली अंबरनाथ मधील 35 शाळांनी नोंदी करून 20 शाळांनी सक्रीय सहभाग घेऊन प्लास्टिक गोळा करून, प्लास्टिक रिसायकलिंगला पाठवून त्या बद्दल जनजागृती केली. जास्तीत जास्त प्लास्टिक ज्या शाळेने जमा करून रिसायकलिंगसाठी पाठवले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले. यात पाच टॉपर विजेते घोषित करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले. त्यासोबतच सहभाग घेतलेल्याल्या शाळांना देखील सन्मान चिन्ह देण्यात आले.

या वेळीस ICPE चे मॅनेजर सिस्टम कम्युनिकेशनचे सुधीर खुराना यांनी सहभागी झालेल्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्लास्टिक रिसायकलिंग बद्दल माहिती दिली.

सेंट मेरी हायस्कूल सीईओ आणि प्रोजेक्ट मॅनेजर विंदा भुस्कुटे यांनी या कॉन्टेस्टमध्ये पारितोषक आणि सहभाग घेतलेल्या शाळांचे आभार मानत ही शुंकला आपण अविरत सुरू ठेवत असून पुढील वेळेस प्रत्येक शाळेने तीन शाळा एकत्रित करून मोठ्या प्रमाणात अभियान राबविण्यास जास्तीत जास्त शाळांनी यापुढे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट मॅनेजर सस्टेनबिलिटी मनोज मिश्रा यांनी प्लास्टिक रिसायकलिंग ची गरज काय आहे ती या देशाच्या भाग्य विधात्यांना समजली पाहिजे यावर भाष्य करत प्लास्टिक रिसायकलिंग करण्यास पाठवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आर्य ग्लोबलच्या डायरेक्टर नीलम मलिक यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले की, आपण जे आपल्या मातीकडून घेतो ते आपण त्या मातीला परत देत असतो. हे एक सायकल आहे म्हणून आपण प्लास्टिकचे नक्की काय करायचे यावर विचार आणि कृती करायला हवी.

आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक यांनी परदेशात आपल्या देशातील माणूस जेव्हा राहतो तेव्हा तो तेथील रूल्स आणि रेगुलेशन कडक असल्यामुळे त्यांचे पालन करतो. रस्त्यावर कचरा फेकत नाही. आणि तोच व्यक्ती इंडियात आल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकत असतो. म्हणून आपल्या देशातील कायदे कडक करण्याची गरज असल्याचे यावेळेस बोलून दाखवले.

आर्य गुरुकुल शाळेच्या प्रिन्सिपल राधामनी अय्यर यांनी सांगितले की आपली सिस्टम गावापासून लहाणपणी मी देखील पाहत आले आहे की निसर्गाची कोणतीच वस्तू वेस्ट जात नाही.

या कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक रिसायकलिंग बाबत अवेअरनेस साठी Arya Gurukul शाळेतील मुलांनी पथनाट्य करून जनजागृती केली. Arya Gurukul स्कूल आनंदमय वातावरणात कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळेस Arya Gurukul अंबरनाथ प्रिन्सिपल निलेश राठोर, सेंट मेरीच्या मुख्याध्यापिका दिव्य बोरसे आणि मोठ्या संख्यने शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होता.

ज्या शाळेच्या मुलांनी प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंग साठी पाठवले त्यांनी आपले अनुभव शेअर करत त्याची गरज सध्याच्या परिस्थितीत किती प्रमाणात आहे याबद्दलचे कथन केले.

Plastic Recycle Warrior Contest Prize Distribution Ceremony held at Arya Gurukul

Arya Gurukul अंबरनाथ यांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात युनिव्हर्सल आउटलुकची कल्पना केली चित्रित

Arya Gurukul : प्रतिभावान, उत्साही मुलांनी आणि अभिमानाने भरलेल्या उत्सुक पालकांनी प्रेक्षकांनी उत्साही वातावरणात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ५ एप्रिल २४ रोजी आर्य गुरुकुल, अंबरनाथने स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन साजरा केला.

आर्य गुरुकुल शाळा ही एक क्रियाकलाप-आधारित शाळा आहे जी शैक्षणिक विषयावर समान भर देते. या शाळेत सर्वांगीण शिक्षण ही केवळ शाब्दिक संकल्पना नाही तर प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक वर्गात, दररोज पाहिले जाऊ शकते. वार्षिक स्नेहसंमेलन दिनाचा कार्यक्रम हा अपवाद नव्हता आणि प्रत्यक्षात मुले वर्षभर शिकत असलेल्या सर्व गोष्टींचा तो कळस दिसून आला.

ही वस्तुस्थिती शिक्षण संचालक डॉ. नीलम मलिक यांनी मांडली. त्यांच्या मते, वार्षिक दिवशी मुले काय करतात ते वर्षभरात त्यांना मिळालेले अनेक जीवन धडे दर्शवतात. डॉ. मलिक यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक चढउतारात त्यांच्या सोबत राहण्याचा मनापासून संदेश देखील व्यक्त केला.

पालकत्वाच्या मूलभूत गरजांची एक सौम्य आठवण त्याच धर्तीवर एक संदेश डॉ कल्पना श्रीवास्तव, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांनी दिला होता, ज्यांनी सहमती दर्शवली की मुलांना वेळ देणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

यावेळी बोलताना एन. नीलेश राठोर, आर्य गुरुकुल, अंबरनाथचे प्राचार्य यांनी भर दिला की यशाचा मार्ग हा नेहमीच आव्हानांनी भरलेला असतो जो एखाद्याचे कौशल्य निर्माण करून पूर्ण करता येतो. आर्य गुरुकुल, अंबरनाथने LSRW (ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन) शिकण्याचा दृष्टीकोन घेतला आहे आणि या वर्षी शाळा वाचनावर विशेष लक्ष केंद्रित करेल. आर्य गुरुकुल ही चिन्मय मिशन शाळा आहे आणि ती चिन्मय व्हिजन प्रोग्रामचे अनुसरण करते आणि युनिव्हर्सल आउटलुक हे CVP च्या स्तंभांपैकी एक आहे.

या कार्यक्रमात शाळेने जंगल बुकचे चित्रण केल्यामुळे, समाज त्याच्या सुरळीत कामकाजासाठी प्रत्येक सदस्यावर कसा अवलंबून आहे याची आठवण करून दिली. असा विचार प्रमुख अतिथी संजय श्रीवास्तव, जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी यांनी आपल्या भाषणात मांडला. ते म्हणाले की रुडियार्ड किपलिंगच्या जंगल बुकमधील प्रत्येक पात्र आपल्या मनावर अमिट छाप सोडते आणि शौर्य आणि परस्पर कौशल्याचे विविध गुण दर्शवते. त्यात वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना दाखवण्यात आली आहे.

ते म्हणाले की जरी अनेक क्षेत्रे आणि व्यवसाय अर्थव्यवस्थेच्या आणि राष्ट्राच्या वाढीस हातभार लावत असले तरी, एक क्षेत्र जे सर्वात जास्त योगदान देते ते म्हणजे ‘शिक्षण’, कारण ते मुलांना विविध व्यवसाय स्वीकारण्यासाठी एक पाया तयार करते.

कार्यक्रमाला आर्य ग्लोबल अध्यक्ष भारत मलिक, आयटी प्रमुख, कृशांक मलिक आणि डिझाइन प्रमुख, भूमिका रे मलिक उपस्थित होते. उपस्थित इतर मान्यवरांमध्ये आर्य ग्लोबल स्कूल्सचे कंप्लायन्स हेड, सेंट मेरीजच्या प्राचार्या श्रीमती दिव्या बोरसे ,सीईओ सेंट मेरीज डॉ. विंदा भुस्कुटे, आर्य गुरुकुल नंदिवलीच्या प्राचार्या राधामणी अय्यर, आर्य गुरुकुलच्या अंबरनाथ प्राचार्या नीलेश राठोर, आर्य गुरुकुल अंबरनाथचे उपप्राचार्य श्रीमती गीता नायर, शैक्षणिक समन्वयक, केंद्रप्रमुख, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, कर्मचारी, PTA चे सदस्य, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फाऊंडेशन, आर्य गुरुकुल, अंबरनाथ बद्दल बोलताना शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कर्तृत्वाने कौशल्य निर्माण करणारी संस्था म्हणून शाळेच्या कामगिरीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. कार्यक्रमाला इंडस व्हॅली पार्टनर्सचे बिझनेस कन्सल्टंट आणि विश्लेषक निहाल पांडे, आयडीएफसी बँकेचे प्रोडक्ट मॅनेजर भानुशाली आणि एचआरमध्ये काम करणाऱ्या सुश्री अदिती थेंगे उपस्थित होते. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने शाळेने त्यांना आत्मविश्वास, सक्षम व्यक्ती बनण्यासाठी आणि त्यांची सामर्थ्ये शोधण्याच्या अनेक संधी कशा दिल्या हे बोलून दाखवले.

नाटक, इमसीइंग, लाइव्ह गायन, नृत्य आणि मुलांची अप्रतिम स्टेज उपस्थिती असलेला हा कार्यक्रम येणारे दिवस स्मरणात राहील. 500 हून अधिक विद्यार्थ्यांचे परिश्रम, केवळ स्टेजवरच नव्हे, तर कला प्रतिष्ठान आणि इतर योगदानांद्वारेही या वार्षिक स्नेहसंमेलन दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.

Annual convocation of Arya Gurukul Ambernath