Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंजिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल.

आप्पा शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)

________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)

_____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते.” –उदय रसाळ (माजी नगरसेवक)

____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे.”शाहीन मुल्ला (समाजसेविका)

Kalyan News : KDMC ‘D’ ward area is still a haven for addicts

प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा Arya Gurukul मध्ये संपन्न

Arya Gurukul : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट (ICPE ) आयोजित
शुंकला ऑर्गनाइज फॉर सस्टेंनेबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने पूस्मा आणि आर्य ग्लोबल यांच्या पुढाकाराने Arya Gurukul नांदीवली येथे
प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा 2024 पार पडला.

पुस्मा आणि आर्य ग्लोबल तर्फे 3 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कल्याण डोंबिवली अंबरनाथ मधील 35 शाळांनी नोंदी करून 20 शाळांनी सक्रीय सहभाग घेऊन प्लास्टिक गोळा करून, प्लास्टिक रिसायकलिंगला पाठवून त्या बद्दल जनजागृती केली. जास्तीत जास्त प्लास्टिक ज्या शाळेने जमा करून रिसायकलिंगसाठी पाठवले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले. यात पाच टॉपर विजेते घोषित करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले. त्यासोबतच सहभाग घेतलेल्याल्या शाळांना देखील सन्मान चिन्ह देण्यात आले.

या वेळीस ICPE चे मॅनेजर सिस्टम कम्युनिकेशनचे सुधीर खुराना यांनी सहभागी झालेल्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्लास्टिक रिसायकलिंग बद्दल माहिती दिली.

सेंट मेरी हायस्कूल सीईओ आणि प्रोजेक्ट मॅनेजर विंदा भुस्कुटे यांनी या कॉन्टेस्टमध्ये पारितोषक आणि सहभाग घेतलेल्या शाळांचे आभार मानत ही शुंकला आपण अविरत सुरू ठेवत असून पुढील वेळेस प्रत्येक शाळेने तीन शाळा एकत्रित करून मोठ्या प्रमाणात अभियान राबविण्यास जास्तीत जास्त शाळांनी यापुढे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट मॅनेजर सस्टेनबिलिटी मनोज मिश्रा यांनी प्लास्टिक रिसायकलिंग ची गरज काय आहे ती या देशाच्या भाग्य विधात्यांना समजली पाहिजे यावर भाष्य करत प्लास्टिक रिसायकलिंग करण्यास पाठवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आर्य ग्लोबलच्या डायरेक्टर नीलम मलिक यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले की, आपण जे आपल्या मातीकडून घेतो ते आपण त्या मातीला परत देत असतो. हे एक सायकल आहे म्हणून आपण प्लास्टिकचे नक्की काय करायचे यावर विचार आणि कृती करायला हवी.

आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक यांनी परदेशात आपल्या देशातील माणूस जेव्हा राहतो तेव्हा तो तेथील रूल्स आणि रेगुलेशन कडक असल्यामुळे त्यांचे पालन करतो. रस्त्यावर कचरा फेकत नाही. आणि तोच व्यक्ती इंडियात आल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकत असतो. म्हणून आपल्या देशातील कायदे कडक करण्याची गरज असल्याचे यावेळेस बोलून दाखवले.

आर्य गुरुकुल शाळेच्या प्रिन्सिपल राधामनी अय्यर यांनी सांगितले की आपली सिस्टम गावापासून लहाणपणी मी देखील पाहत आले आहे की निसर्गाची कोणतीच वस्तू वेस्ट जात नाही.

या कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक रिसायकलिंग बाबत अवेअरनेस साठी Arya Gurukul शाळेतील मुलांनी पथनाट्य करून जनजागृती केली. Arya Gurukul स्कूल आनंदमय वातावरणात कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळेस Arya Gurukul अंबरनाथ प्रिन्सिपल निलेश राठोर, सेंट मेरीच्या मुख्याध्यापिका दिव्य बोरसे आणि मोठ्या संख्यने शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होता.

ज्या शाळेच्या मुलांनी प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंग साठी पाठवले त्यांनी आपले अनुभव शेअर करत त्याची गरज सध्याच्या परिस्थितीत किती प्रमाणात आहे याबद्दलचे कथन केले.

Plastic Recycle Warrior Contest Prize Distribution Ceremony held at Arya Gurukul

Arya Gurukul अंबरनाथ यांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात युनिव्हर्सल आउटलुकची कल्पना केली चित्रित

Arya Gurukul : प्रतिभावान, उत्साही मुलांनी आणि अभिमानाने भरलेल्या उत्सुक पालकांनी प्रेक्षकांनी उत्साही वातावरणात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ५ एप्रिल २४ रोजी आर्य गुरुकुल, अंबरनाथने स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन साजरा केला.

आर्य गुरुकुल शाळा ही एक क्रियाकलाप-आधारित शाळा आहे जी शैक्षणिक विषयावर समान भर देते. या शाळेत सर्वांगीण शिक्षण ही केवळ शाब्दिक संकल्पना नाही तर प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक वर्गात, दररोज पाहिले जाऊ शकते. वार्षिक स्नेहसंमेलन दिनाचा कार्यक्रम हा अपवाद नव्हता आणि प्रत्यक्षात मुले वर्षभर शिकत असलेल्या सर्व गोष्टींचा तो कळस दिसून आला.

ही वस्तुस्थिती शिक्षण संचालक डॉ. नीलम मलिक यांनी मांडली. त्यांच्या मते, वार्षिक दिवशी मुले काय करतात ते वर्षभरात त्यांना मिळालेले अनेक जीवन धडे दर्शवतात. डॉ. मलिक यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक चढउतारात त्यांच्या सोबत राहण्याचा मनापासून संदेश देखील व्यक्त केला.

पालकत्वाच्या मूलभूत गरजांची एक सौम्य आठवण त्याच धर्तीवर एक संदेश डॉ कल्पना श्रीवास्तव, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांनी दिला होता, ज्यांनी सहमती दर्शवली की मुलांना वेळ देणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

यावेळी बोलताना एन. नीलेश राठोर, आर्य गुरुकुल, अंबरनाथचे प्राचार्य यांनी भर दिला की यशाचा मार्ग हा नेहमीच आव्हानांनी भरलेला असतो जो एखाद्याचे कौशल्य निर्माण करून पूर्ण करता येतो. आर्य गुरुकुल, अंबरनाथने LSRW (ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन) शिकण्याचा दृष्टीकोन घेतला आहे आणि या वर्षी शाळा वाचनावर विशेष लक्ष केंद्रित करेल. आर्य गुरुकुल ही चिन्मय मिशन शाळा आहे आणि ती चिन्मय व्हिजन प्रोग्रामचे अनुसरण करते आणि युनिव्हर्सल आउटलुक हे CVP च्या स्तंभांपैकी एक आहे.

या कार्यक्रमात शाळेने जंगल बुकचे चित्रण केल्यामुळे, समाज त्याच्या सुरळीत कामकाजासाठी प्रत्येक सदस्यावर कसा अवलंबून आहे याची आठवण करून दिली. असा विचार प्रमुख अतिथी संजय श्रीवास्तव, जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी यांनी आपल्या भाषणात मांडला. ते म्हणाले की रुडियार्ड किपलिंगच्या जंगल बुकमधील प्रत्येक पात्र आपल्या मनावर अमिट छाप सोडते आणि शौर्य आणि परस्पर कौशल्याचे विविध गुण दर्शवते. त्यात वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना दाखवण्यात आली आहे.

ते म्हणाले की जरी अनेक क्षेत्रे आणि व्यवसाय अर्थव्यवस्थेच्या आणि राष्ट्राच्या वाढीस हातभार लावत असले तरी, एक क्षेत्र जे सर्वात जास्त योगदान देते ते म्हणजे ‘शिक्षण’, कारण ते मुलांना विविध व्यवसाय स्वीकारण्यासाठी एक पाया तयार करते.

कार्यक्रमाला आर्य ग्लोबल अध्यक्ष भारत मलिक, आयटी प्रमुख, कृशांक मलिक आणि डिझाइन प्रमुख, भूमिका रे मलिक उपस्थित होते. उपस्थित इतर मान्यवरांमध्ये आर्य ग्लोबल स्कूल्सचे कंप्लायन्स हेड, सेंट मेरीजच्या प्राचार्या श्रीमती दिव्या बोरसे ,सीईओ सेंट मेरीज डॉ. विंदा भुस्कुटे, आर्य गुरुकुल नंदिवलीच्या प्राचार्या राधामणी अय्यर, आर्य गुरुकुलच्या अंबरनाथ प्राचार्या नीलेश राठोर, आर्य गुरुकुल अंबरनाथचे उपप्राचार्य श्रीमती गीता नायर, शैक्षणिक समन्वयक, केंद्रप्रमुख, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, कर्मचारी, PTA चे सदस्य, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फाऊंडेशन, आर्य गुरुकुल, अंबरनाथ बद्दल बोलताना शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कर्तृत्वाने कौशल्य निर्माण करणारी संस्था म्हणून शाळेच्या कामगिरीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. कार्यक्रमाला इंडस व्हॅली पार्टनर्सचे बिझनेस कन्सल्टंट आणि विश्लेषक निहाल पांडे, आयडीएफसी बँकेचे प्रोडक्ट मॅनेजर भानुशाली आणि एचआरमध्ये काम करणाऱ्या सुश्री अदिती थेंगे उपस्थित होते. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने शाळेने त्यांना आत्मविश्वास, सक्षम व्यक्ती बनण्यासाठी आणि त्यांची सामर्थ्ये शोधण्याच्या अनेक संधी कशा दिल्या हे बोलून दाखवले.

नाटक, इमसीइंग, लाइव्ह गायन, नृत्य आणि मुलांची अप्रतिम स्टेज उपस्थिती असलेला हा कार्यक्रम येणारे दिवस स्मरणात राहील. 500 हून अधिक विद्यार्थ्यांचे परिश्रम, केवळ स्टेजवरच नव्हे, तर कला प्रतिष्ठान आणि इतर योगदानांद्वारेही या वार्षिक स्नेहसंमेलन दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.

Annual convocation of Arya Gurukul Ambernath

Kalyan Loksabha Election : कल्याण डोंबिवलीत ‘या’ दिवशी होणार मतदान

Kalyan Loksabha Election : लोकसभा निवडणुक २०२४ चे बिगुल वाजले असून देशात एकूण सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रत्येक टप्प्यात विविध मतदार संघ समाविष्ट केले असून शेवटच्या टप्प्यात कल्याण डोंबिवलीत २० मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदान हे लोकसभा क्षेत्रानुसार घेतले जात असून २० मे रोजी कल्याण लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडणार आहे. यात कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा-कळवा आदी भागांचा समावेश आहे. तर कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा क्षेत्रात येत असून कल्याण पश्चिमचे मतदारही २० मे रोजीच मतदान करतील. कल्याण, भिवंडी सह ठाणे, पालघर, मुंबईतील सहा मतदारसंघ, नाशिक, दिंडोरी व धुळे या मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून या ठिकाणी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे असे मतदानाचे पाच टप्पे आहेत. तर देशभरात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून पर्यंत ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी असून निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समिकरणामुळे कल्याण डोंबिवलीतील गणिते देखील बदलली आहेत. आता नेमकं किती मतांनी कोण निवडून येतंय? तसेच त्यापूर्वी कोणा विरुद्ध कोण उभं राहतंय? याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे डोळे लागून आहेत.

संतोष दिवाडकर

Kalyan Loksabha Election : Voting will be held in Kalyan Dombivli on this day

Little Aryan’s Pre-K ने वार्षिक स्नेहसंमेलना दिवशी दिला महत्त्वाचा संदेश; स्व-अभ्यासावर लक्ष केंद्रित करा! शिकवण्यांना गूड बाय करा.

Little Aryan’s Pre-K : आर्यग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष आणि संचालक श्री.भरत मलिक आणि डॉ.नीलम मलिक यांनी त्यांच्या पालकांना शाळेनंतर मुलांवर अतिरिक्त दबाव आणू नये याची आठवण करून दिली.

लिटल आर्यन्स प्री-के, नांदिवलीचा वार्षिक दिवस थीम “मुंबई मॅजिक” सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली , लहान मुलांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि मुंबईत राहणाऱ्या अनोख्या लोकांचे चित्रण करून “पीपल कॉल्ड मुंबई” या पुस्तकाच्या अप्रतिम रूपांतरातून त्यांच्या प्रेमाची मागणी केली.

त्यांनी खार दांडा येथे काम करणारे लोक, कुंभारवाड्याचे कुंभार, बॉलीवूडच्या शो बिझनेसमधील लोक आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणारे मॉडेल्स, प्रसिद्ध ब्रून मस्का बनवणारे पानवाला आणि रेस्टॉरंटर्स, हे कुटुंब दाखवले.

प्रसिद्ध लालबाग चा राजा आणि अनेक कथा. हे YouTube चॅनेलच्या स्वरूपात चित्रित करण्यात आल्या. लिटल आर्यन प्री-केच्या तरुण पालकांना मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. करणदीप सिंग यांनी हुशार मुलांचे कौतुक केले आणि मुलांना त्यांच्या अनेक अद्वितीय कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.
अतिथी श्री साहेबराव मुळ्ये, FDA विभागाचे अन्न,औषध विभाग सुरक्षा अधिकारी आणि श्रीमती.वैशाली मुळ्ये यांनी चिमुकल्या मुलांनी इतकी चांगली कामगिरी करताना, सहज संवाद साधताना आणि स्टेजवर इतका आत्मविश्वास पाहून आनंद व्यक्त केला.

लिटिल आर्यन्स प्री-के त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्या मुलांचे पालनपोषण करतात त्यांच्यामुळे वेगळे आहे आणि वार्षिक दिवसात त्यांच्या कुशल माजी विद्यार्थ्यांना बोलावणे अत्यावश्यक होईल. डॉ. मंथन भानवत, कु. वेदिका चव्हाण आणि सौ. कार्यक्रमात तनिषा टेमघरे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. भानवत यांनी लहान आर्य आणि आर्य गुरुकुल यांनी त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद आणि कुटुंबाचा आदर ही मूलभूत मूल्ये कशी रुजवली हे सांगितले. कु. वेदिकाने सांगितले की शाळा हे तिचे दुसरे घर बनले आहे जिथे तिने बुद्धिबळ, क्रिकेट, नृत्य शिकले आणि शैक्षणिक क्षेत्रातही प्रावीण्य मिळवले.

त्यांच्यासारखे विद्यार्थी हे दाखवतात की शिक्षण हे दडपण न घेता सर्वात फलदायी असते आणि छंद जोपासण्यासाठी आणि अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी कोणत्याही शिकवणी किंवा अतिरिक्त वर्गांची आवश्यकता नसते.

Little Aryan’s Pre-K delivers an important message on annual reunion day

Detonators Kalyan : डेटोनेटर म्हणजे नक्की काय? कुठे होतो वापर?

Detonators Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बुधवारी डेटोनेटरचे बॉक्स सापडल्याने एकच खळबळ माजली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून बॉम्ब स्कॉड बोलावण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी ५४ डेटोनेटर ताब्यात घेतले. रेल्वे स्थानक परिसरात घातपात घडवण्याचा कट होता का असा संशय आता व्यक्त केला जात असून पोलीस सीसीटीव्ही मार्फत पुढील तपास करीत आहे.

डिटोनेटर हे बॉम्ब सक्रिय करणारे उपकरण आहे. याला बॉम्बचा ट्रिगर असेही म्हणतात. खड्डे खोदून लपविलेल्या आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसेस) बॉम्बमध्ये त्याचा वापर केला जातो. डिटोनेटर बॉम्बची स्फोटक शक्ती वाढवण्याचे काम करतो. डिटोनेटर हे डिटोनेशन चार्ज असलेले एक उपकरण आहे. ज्याचा वापर निश्चित वेळी आणि क्रमाने विश्वासार्हपणे स्फोट सुरू करण्यासाठी केला जातो. हे नॉन-इलेक्ट्रिक अथवा इलेक्ट्रिक असतात. रेल्वेमध्येही डिटोनेटर्सचा वापर केला जातो. हे खराब ट्रॅक शोधण्यासाठी वापरले जाते. तसेच तलावांमध्ये गैरप्रकारे मासेमारी करण्यासाठी आणि खाणींमध्ये ब्लास्टिंगच्या कामासाठी डिटोनेटर्सचा वापर केला जातो.

कल्याण रेल्वे स्थानकात असे ५४ डिटोनेटर सापडल्याने प्रवाश्यांमध्ये देखील घबराट उडाली होती. हे उपकरण नेमके कशासाठी व कोणी आणून ठेवले होते याचा सखोल तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. हे उपकरण घातपातासाठी आणण्यात आले होते की या पाठीमागे अवैध उत्खनन आणि भूमाफियांचा हात आहे ही बाब देखील तपासाअंती समोर येणार आहे.

Detonators Kalyan : What exactly is a detonator? Where is it used?

KDMC आरोग्य विभागा विरोधात समाजसेवकांनी मांडला ठिय्या

KDMC : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सद्या मोठ्या चर्चेतील विषय बनला आहे. पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था अकार्यक्षम असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मात्र पालिका प्रशासन या सर्व आरोपांचे खंडण वेळोवेळी करीत असून आमची आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे परिपत्रक काढून सांगत आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरिकिसनदास रुग्णालयात जाणीव सामजिक संस्थेचे पदाधिकारी समाजसेवक प्रथमेश सावंत यांच्या पुढाकाराने ठिय्या मांडून बसले असून काही वेळापूर्वी महापालिका वैधकिय अधिकारी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उस्थित राहिले होते.

महानगरालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे आरोप राजकीय पक्षांमार्फत देखील करण्यात आले असून मनसेने ट्रॉफी देऊन आंदोलन केले होते. या अगोदर एका महिलेची पालिका रुग्णालयाच्या दालनात प्रसृती झाल्याने महानगरपालिका प्रशसनावर टीकेची झोड उठली होती.

शासकीय रुग्णालयात रुग्णांना लागणारे औषध गोळ्यांचा अपुरा पुरवठा, उपलब्ध नसलेले इंजेक्शन, अपुरे मनुष्बळ, उपचारासाठी कळवा येथे पाठविणे अशा अनेक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागावर सवाल उपस्थित केले जात असून त्यांचे खाजगी रुग्णालयाशी हितसंबंध आहेत असेही आरोप सामान्य नागरिक करू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील गीता हरिकिसनदास रुग्णालयाच्या कारभारा विरोधात समाजसेवक प्रथमेश सावंत यांनी ठिय्या मांडला असून जोपर्यंत समाधानकारक उत्तर दिली जात नाही तोवर इथून हटणार नाही असे सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अधिकाऱ्यांना सवाल उपस्थित केले. जनतेकडून आरोग्य सेवेचा कर घेता मग परिपूर्ण सेवा का देत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

-संतोष दिवाडकर

Social workers organized against KDMC health department

केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न

कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे.

आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे. सर्व प्रथम लोकांना या देशात आपले अधिकार समजायला हवेत. देशाचा पाया हा १४० कोटी लोकसंख्येच्या हाती आहे. आपलं घर स्वच्छ असावं असे वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर देश स्वच्छ असावं असं का वाटतं नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात ही जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे, की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर गल्ली स्वच्छ झाला पाहिजे. मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील?

आज केडीएमसी ९ आय प्रभागात झालेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी, शिवसेना युवासेनेचे मधुर म्हात्रे, एल.एल.घुटे, स्वच्छता निरिक्षक मोहन दिघे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, संतोष खामकर उप विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक रोहिदास पाटील व शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १०० कर्मचारी, फेरीवाला संघटनेचे सदस्य सह अनेक समाजसेवक, नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे अभियान चेतना शाळा, बुद्ध विहार, एसार पेट्रोल पंप ते नांदिवली कमान, नांदिवली गाव तलाव, आर्य गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले. या वेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केले आहे की स्वच्छ्ता ही आपली सेवा आहे.

संतोष दिवाडकर

‘Swachhta Hi Seva’ campaign under KDMC 9-I Ward concluded

कल्याण पूर्वेच्या गणेश टेकडीचा होणार कायापालट

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ५ ड कार्यालयाच्या मागे असलेल्या टेकडी वरील गणेश मंदिर तसेच टेकडीच्या सुशोभिकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन पूजा पाठ करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गणेश टेकडी कल्याण पूर्व महानगरपालिका ड प्रभागाला लागून आहे. याच टेकडीवर सुमारे दीडशे वर्षांपासून गणपती विराजमान असल्याचे सांगितले जाते. शहरीकरण होण्यापूर्वीच्या कल्याणची साक्ष देणारी नेतीवली प्रमाणेच ही देखील एक टेकडी असल्याचे मानले जाते. मात्र मागील काळात या टेकडीवर अपप्रवृत्तीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले होते. या टेकडीवर अश्लील चाळे, गर्दुल्ल्यांचे अमली पदार्थांचे सेवन, मद्यसेवन, चोरी, लूटमार, परिसरातील लोकांच्या घरावर दगडी मारणे अशा घटना घडत होत्या.

अलिकडल्या काळात गणेश टेकडी आपले रूप पालटत असून मंदिर परिसराचे देखील सुशोभीकरण होणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेकरांसाठी हा परिसर धार्मिक तसेच ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांना या उंच ठिकाणी विरंगुळा मिळणार आहे. कधी नव्हे ते टेकडी परिसर सर्वांसाठी सुरक्षित प्रेक्षणीय स्थळ होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनाही आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

संतोष दिवाडकर

Ganesh hill of Kalyan East will be transformed

कोकणात हजारो एसटी बसेस तर इतर महाराष्ट्राकडे महामंडळाचे दुर्लक्ष? आरक्षित असलेली एसटी बस केली रद्द

विठ्ठलवाडी : गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी हजारो एसटी बसेस मुंबई तसेच राज्यभरातून मार्गस्थ करण्यात येत आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी जाणाऱ्या काही एसटी बसेस रुद्ध होत असल्याने त्या भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातून शेकडो एसटी बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांमार्फत देखील शेकडो एसटी गाड्या मार्गस्थ केल्या गेल्या. मात्र सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सुटणारी विठ्ठलवाडी गोंदवले ही एसटी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रुद्ध झाल्याची माहिती विठ्ठलवाडी एसटी आगाराकडून प्रवाशांना देण्यात आली. तिकिटासाठी भरलेले पैसे परत मिळतील असे सांगण्यात आले असले तरी फक्त पैसे महत्त्वाचे नसून आमची मोठी गैरसोय झाली असल्याचा संताप प्रवासी व्यक्त करीत आहेत.

गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासाठी नियमीत सुटणाऱ्या व रिजर्वेशन असलेल्या बसेस रुद्ध करणे किती योग्य आहे ? असा सवाल प्रवाशांमार्फत विचारला जात आहे. विठ्ठलवाडी एसटी आगारातून अगदी जेमतेमच गाड्या पुणे सातारा मार्गावर धावतात. त्यातच गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी रुद्ध झाल्याने गणेशोत्सव महाराष्ट्राच्या इतर भागात नसतो का ? असा सवाल एसटी महामंडळाकडे उपस्थित केला जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर एसटी ही सातारा विभागाच्या दहीवडी आगाराची असून त्यांनी ही एसटी रुद्ध केली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दहीवडी आगाराशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. रिजर्वेशन असलेली एसटी बस रुद्ध झाल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करणे ही जबाबदारी एसटी महामंडळाची नाही का? की सर्व सामान्य माणसाला गृहीत धरून मनमौजी कारभार सुरू आहे असा प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत.

संतोष दिवाडकर

ST Corporation’s neglect of other Maharashtra?