कल्याण शिव भीम संघटनेने फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना मिठाई वाटून केली दिवाळी गोड

कल्याण : कल्याण शिव-भीम मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक व्यापारी, कामगार संघटना कल्याण येथे कार्यरत असून सदर संघटना दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा, इत्यादी विक्री व वाहतूक करणारे व्यापारी कामगार वाहतूकदार यांचे न्याय हक्कासाठी लढत असते. या संघटनेने दिवाळी निमित्ताने समाजात फ्रंटलाईनवर कार्यरत असलेले पोलीस, पत्रकार व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले. तसेच संपूर्ण समाजातून कल्याण शिव भीम संघटनेच्या या कार्याचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले.

दरवर्षी रक्षा बंधन, दसरा, गणेश उत्सव दिवाळी सणानिमीत्त खवा विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच बनावट खव्याच्या नावावर काही तोतया पोलीस, पत्रकार, अधिकारी, खंडणी खोर कार्यकर्ते हे व्यापारी, दुकानदार व वाहतूकदार यांना त्रास देतात. वेळ दवडून तपासणी करायची नसेल तर खंडणी मागितली जाते. सदर बाबतीत संघटनेचे संस्थापक तथा कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, संघटना अध्यक्ष सागर पगारे, सचिव जयदीप सानप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध मंत्री बाबा अत्राम तसेच अन्न व औषध सह आयुक्त सुरेश देशमुख, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त डॉ सुधाकर पाठारे, वाहतूक पोलीस उप आयुक्त डॉ विनयकुमार राठोड, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, सहायक पोलिस आयुक्त वाहतूक विभाग मंदार धर्माधिकारी, पत्रकार व सर्व वरीष्ठ अधीकारी कर्मचारी यांना निवेदन देऊन पत्र व्यवहार करून प्रत्यक्षात भेटुन खव्या बाबत जनजागृती करून दिली.

बनावट खवा म्हणजे काय? त्या बाबत संघटनेने प्रसार माध्यमांवर माहिती देऊन जनजागृती केली. या बाबतीत सर्व अधिकाऱ्यांनी खातर जमा करत सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधीपत्या खालील अधिकारी कर्मचारी यांना लेखी सूचना केली की व्यापारी संघटना व व्यापारी यांवर गैर प्रकारे कार्यवाही करू नयेत तसेच बनावटी पोलीस, पत्रकार, खंडणी खोर यांच्यावर कार्यवाही करावी. व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. अशा सूचना दिल्याने अडवणूक करणारे तसेच खंडणी खोर यांच्यावर अंकुश बसला असून व्यापाऱ्यांनी निर्धास्तपणे व्यवसाय केला. असे म्हणत संघटना सचिव जयदीप सानप यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. तसेच दरवर्षी असेच सहकार्य मिळण्याची त्यांनी आशा व्यक्त केली.

सण उत्सवात व्यस्त असणारे पोलीस व न्याय हक्कासाठी लढणारे लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ मानले जाणारे पत्रकार यांना दिवाळी निमित मिठाई वाटप करण्यात आली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मुंब्रा, टिटवाळा, तलासरी येथे एकुण दोन हजार मिठाई बॉक्स वाटप करण्यात आले. मिठाई वाटप करताना अरविंद मोरे, जयदीप सानप, सागर पगारे, राजा जाधव, विनोद शिंपी, पवन पाटिल, अशोक पाटिल उपस्थिती असल्याची माहिती जयदीप सानप यांनी दिली आहे.

Kalyan Shiv Bhim organization distributed sweets to frontline workers and made Diwali sweet

Subrata Roy : लाखो कुटुंबांचा ‘सहारा’ तुटला; मुळशी मावळचा पोशिंदा गेला

Subrata Roy : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख, लोणावळ्या जवळील अँबी व्हॅली सिटीचे मालक सुबरोटो रॉय यांचे मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना बीपी आणि शुगर वाढण्याचा त्रास होता. हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर लखनऊ मध्ये अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनाने मावळ व मुळशी तालुक्यातील भागांत हळहळ व्यक्त केली जात असून हजारो कुटुंबांचा पोशिंदा हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली सुब्रतो रॉय यांचा बिहारमध्ये जन्म झाला. आणि त्यांचे शिक्षण कोलकाता आणि उत्तर प्रदेशात पूर्ण झाले. अत्यंत कमी वयात देश दौरा घडत असल्याने संपूर्ण देशच त्यांचे घर बनले होते. म्हणूनच ज्या काळात रस्ता, वीज अशा सोयी सुविधा नसतानाही मुंबई पुण्याच्या मध्यभागी असलेल्या लोणावळ्याच्या आतील बाजूस असणाऱ्या खेडोपाड्यात जाऊन त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. ज्याला अँबी व्हॅली सिटी अथवा सहारा म्हणून ओळखले जाते.

अँबी व्हॅली सिटी आणि आर्थिक क्रांती :- ही सिटी बनविण्यासाठी त्यांनी जमीन खरेदी केली. त्यानंतर परदेशात असणाऱ्या सर्व हायजेनिक सोयी सुविधायुक्त शहरा प्रमाणे त्यांनी एक सुंदर असे शहर तयार केले. या शहराच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत त्यांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत होते. यासाठी त्यांनी येथील स्थानिक गावकऱ्यांना रोजगार उभा केला. यामुळे सहारा सिटी च्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम लागले आणि गावातील लोकांना पैसा दिसू लागला. खिशात पैसे खेळू लागल्याने गावकऱ्यांचे राहणीमान सुधारले. मुलांची शिक्षणे झाली, मुलींची लग्न झाली. पैशाला पैसा जोडून शेतकरी व्यवसाय करू लागले.

अँबी व्हॅली सिटी मुळे जवळपास हजारो कुटुंबांचे जीवन सुखकर झाले. पुढील पिढ्यांचे भविष्य देखील सुधारले. आज या भागात अनेक धनदांडगे लोक आहेत. मात्र प्रत्येकाच्या सुरुवातीला सहाराचा सहारा आहे. केवळ अँबी व्हॅली सिटीच नव्हे तर सुब्रतो रॉय यांचे देशभरात अनेक व्यवसाय होते.

सुब्रतो रॉय यांची एकूण संपत्ती : त्यांची एकूण संपत्ती दोन लाख ५९ करोड रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पाच कॅम्पस आणि जवळपास ३१ हजार एकर जमीन होती. सुब्रतो रॉय यांची जेट एअरवेज, एअर सहारा अशी स्वतःची एअरलाईन होती. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये आलिशान हॉटेल्स, एक फॉर्म्युला वन टीम आणि आयपीएल मध्ये देखील त्यांनी पुणे वॉरीयर्स इंडिया नावाने टीम बनवली होती. इतकेच नव्हे तर पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम हे त्यांनी बांधलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होते. काळाच्या ओघात ते त्यांच्याकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे आले.

भारताच्या क्रिकेट जर्सीवर २००१ ते २०१३ पर्यंत सहारा इंडिया असे नाव झळकत होते. १३ वर्षे त्यांनी भारतीय संघाला स्पॉन्सर केले होते. मात्र २०१४ पासून त्यांचा पडता काळ चालू झाला आणि त्यांना स्पॉन्सरशिप आणि आयपीएल टीम बंद करावी लागली. पूढे स्टेडियम देखील गमवावे लागले. सेबीचा ससेमिरा पाठी लागण्याने त्यांना दोन वर्षे कारागृहात देखील जावे लागले. यामुळे सहारा परिवार डबघाईला येऊ लागला होता. यानंतर सहारा परिवारने आजपर्यंत कठीण दिवसांचा सामना केला. अशा कठीण परिस्थितीतही सहारा पूर्णपणे बंद झाला नाही. त्यांनी अडखळत का होईना आपले साम्राज्य सुरूच ठेवले. वाढत्या वयात या काळाचा संघर्ष करीत असतानाच शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुब्रतो रॉय यांच्या जाण्याने दोन्ही तालुक्यातील भाग शोकसागरात बुडाले असून गावोगावी हळहळ व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये जन्मलेला एक तारा महाराष्ट्राच्या खेड्यात येतो. तेथील गरीब कष्टकरी गावकऱ्यांना रोजगार देऊन येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलतो. म्हणून सुब्रता रॉय हा या भागाचा पोशिंदा होता असेही म्हणायला हरकत नाही. एकेकाळी काही नसणाऱ्या घरात आजसर्व काही आणि दारातही गाडी आहे. हजारो लाखो लोकांच्या डोक्यावर छत्रछाया देणाऱ्या सुब्रता रॉय यांच्या निधनानंतर सहारा ग्रुप देखील जणू बेसहारा झाला आहे. म्हणूनच आज लोक म्हणतात, “तो आला पण आम्हाला आणि आमच्या जगण्याला ‘सहारा’ देऊन गेला’.

अशा या लाखोंच्या पोशिंद्याला भावपूर्ण श्रद्धांजली !

संतोष दिवाडकर 8767948054

Subrata Roy passed away

व्यसनाधीन तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी VaibhavGaikwad यांनी कसली कंबर

Vaibhav Gaikwad : शहरात अलिकडल्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढीस लागली आहे. मागच्या काळात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात व्यसनाधीनता कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बाब लक्षात घेत नुकतेच भाजपचे युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष पद स्वीकारलेले वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांनी याच मुद्द्यावर आता काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागल्यानंतर पुढे कोणते कामकाज असणार आहे याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राजकारणा पलीकडील अनेक सामाजिक मुद्द्यांवर हात घातला.

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड VaibhavGaikwad हे तरुण वयात आल्यापासूनच सामाजिक क्षेत्रात उतरले होते. आता त्यांची राजकारणात खऱ्या अर्थाने एन्ट्री झाली असली तरी सुरुवातीलाच त्यांनी सामाजिक विषयांवर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. शहरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली असून त्यातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. या तरुणांना यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात मोठ्या पदावर वर्णी लागल्यानंतर त्या पदाला अनुरूप असे काम करण्यावर वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांचा कल असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे.

संतोष दिवाडकर

VaibhavGaikwad efforts to get the young generation out of addiction

VaibhavGaikwad – Press Conference
KDMC आरोग्य विभागा विरोधात समाजसेवकांनी मांडला ठिय्या

KDMC : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सद्या मोठ्या चर्चेतील विषय बनला आहे. पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था अकार्यक्षम असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मात्र पालिका प्रशासन या सर्व आरोपांचे खंडण वेळोवेळी करीत असून आमची आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे परिपत्रक काढून सांगत आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरिकिसनदास रुग्णालयात जाणीव सामजिक संस्थेचे पदाधिकारी समाजसेवक प्रथमेश सावंत यांच्या पुढाकाराने ठिय्या मांडून बसले असून काही वेळापूर्वी महापालिका वैधकिय अधिकारी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उस्थित राहिले होते.

महानगरालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे आरोप राजकीय पक्षांमार्फत देखील करण्यात आले असून मनसेने ट्रॉफी देऊन आंदोलन केले होते. या अगोदर एका महिलेची पालिका रुग्णालयाच्या दालनात प्रसृती झाल्याने महानगरपालिका प्रशसनावर टीकेची झोड उठली होती.

शासकीय रुग्णालयात रुग्णांना लागणारे औषध गोळ्यांचा अपुरा पुरवठा, उपलब्ध नसलेले इंजेक्शन, अपुरे मनुष्बळ, उपचारासाठी कळवा येथे पाठविणे अशा अनेक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागावर सवाल उपस्थित केले जात असून त्यांचे खाजगी रुग्णालयाशी हितसंबंध आहेत असेही आरोप सामान्य नागरिक करू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील गीता हरिकिसनदास रुग्णालयाच्या कारभारा विरोधात समाजसेवक प्रथमेश सावंत यांनी ठिय्या मांडला असून जोपर्यंत समाधानकारक उत्तर दिली जात नाही तोवर इथून हटणार नाही असे सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अधिकाऱ्यांना सवाल उपस्थित केले. जनतेकडून आरोग्य सेवेचा कर घेता मग परिपूर्ण सेवा का देत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

-संतोष दिवाडकर

Social workers organized against KDMC health department

Kalyan च्या कराटे खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले आठ सुवर्णपदक

Kalyan :- मुंबईतील अंधेरी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आठ सुवर्णपदकास गवसणी घातली आहे. ही स्पर्धा कॉम्बॅक्ट्स मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान सह विदेशातून भूटान, नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका येथील १५०० कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.

कल्याणच्या मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या क्लबच्या स्पर्धकांनी स्पर्धेत काता आणि कुमिते यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.

काता प्रकारातील विजेते :

सुवर्णपदक विजेते –

सारंग पवार, सोहम पाटणे, आयुष अडेकर, मंजिरी कुतरवाडे, चेतना साळुंके.

रौप्य पदक विजेते –

किशोर जयशंकर, सुमेध गायकवाड, ओम कांबळे, गौरवी तारी, पारस म्हात्रे, अर्णव यादव.

कांस्य पदक विजेते –

आशिष सहेजराव, आदित्य घानेकर, अंजली गुप्ता, हिमांशु खंडारे, वेद घावरे, आरव बोरेकर, कौस्तुभ चौधरी, श्रेयस पाटील, नैनेश गौर, केतकी सरोदे, प्रांजल कुतरवाडे.

कुमिते प्रकारातील विजेते –

सुवर्ण पदक विजेते –

गौरव तारी, ओम कांबळे, आणि श्रेयस पाटील.

कांस्य पदक विजेते –

चेतना साळुंके, मंजिरी कुतरवाडे, हिमांशू खंडारे, पारस म्हात्रे, अर्णव यादव, आयुष अडेकर, सोहम पाटणे.

या सर्व विजेते खेळाडूंना प्रशिक्षक सेन्साई महेश चिखलकर व सेम्पाई आशिष सहेजराव, सेम्पाई सुमेध गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे क्रिडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांच्याकडून सांगण्यात आले.

संतोष दिवाडकर

Karate players of Kalyan won gold medals in international competition

नर्सिंग कोर्सेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; जॉब इंटरव्ह्यूमध्ये उघड झाला प्रकार

कल्याण : नर्सिंग कोर्सच्या नावाखाली कल्याण मध्ये जवळपास ३०-४० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या संदर्भात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षण संस्थे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण मध्ये एक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून मोठी फी उकळून नर्सिंग कोर्स चालवीत होती. आमची संस्था सरकारी नोंदणीकृत संस्था असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर कोर्सचे सर्टिफिकेट देखील देण्यात आले. मात्र हेच सर्टिफिकेट घेऊन विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तेथे त्यांच्यावर खोटे सर्टिफिकेट देऊन इंटरव्ह्यू देत असल्याचे आरोप केले गेले. यानंतर गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना मिळालेलं सर्टिफिकेट हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. या फसवणुकीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि मेहनत वाया गेली असून जवळपास लाखो रुपयांची कमाई या बोगस शिक्षण संस्थेने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू असून विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

संतोष दिवाडकर

Cheating students in the name of nursing courses

शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी

कल्याण : शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख व मा.नगरसेवक निलेश शिंदे यांच्यावर पक्षाने पुढील वर्षभरासाठी नवी जबाबदारी सोपवली आहे. आगामी महानगरपालिका, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेत निलेश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी, शिवाजीनगर व कोथरूड विधानसभा संपर्कप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढील वर्षभरासाठी निलेश शिंदे सदर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पक्षाचा कार्याचा आढावा घेत राहतील.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र निलेश शिंदे यांना देऊन त्यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. निलेश शिंदे यांनी शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पक्षाचे कार्य आजतागायत पुढे नेले आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असोत की गरजूंना मदतीचा हात यामध्ये ते नेहमी एक पाऊल पुढे राहिले आहेत. समाजातील कामकाज तसेच पक्षासाठीचे आतापर्यंतचे योगदान पाहता त्यांना आता विधानसभा क्षेत्रांच्या संपर्कप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मिळालेली नवी जबाबदारी मोठ्या विश्वासाने पार पाडू, तसेच आतापर्यंत पक्षासाठी ज्या उमेदीने काम करीत आलो तसेच काम इथून पुढेही करीत राहणार असल्याच्या भावना यावेळी निलेश शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

संतोष दिवाडकर

Shiv Sena official Nilesh Shinde has a big responsibility from the party

कल्याण पूर्वेत कल्याण विकासिनी मार्फत आरोग्य शिबीर आणि रोजगार मेळावा संपन्न

कल्याण : कल्याण विकासिनी व वीरशैव लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मा.नगरसेवक उदय रसाळ यांच्या मार्फत आरोग्य शिबीर व रोजगार मेळाव्याचे आयोजन आज कल्याण पूर्वेत करण्यात आले होते. कोळसेवाडी प्रभागातील नागरिकांनी या शिबिरात प्राथमिक आरोग्याची तपासणी करून घेतली. यात ECG, ब्लडप्रेशर, हृदय तपासणी, रक्त तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले.

आरोग्य शिबीरा बरोबरच बेरोजगार तरुणांसाठी, मॅजिक बस या संस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईमेंट लिंक स्किलिंग प्रोग्राम च्या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणीची नोंदणी करून घेण्यात आली आहे. रोजगारासाठी आवश्यक स्किल ट्रेनिंग संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. असे ही उदय रसाळ यांनी सांगितले. या शिबिराला असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला.

शिबिरासाठी सहकार्य करणारे डॉ. गुप्ता, वीरशैव लिंगायत समाज कल्याण या संस्थेचे सचिव जितेंद्र लिगाडे, मॅजिक बस चे समन्वयक प्रदीप सोनावणे, कल्याण विकासिनीचे अजित शिंदे, राकेश गायकवाड, गोविंद लहाने, संजय केदारे, अनिल सुरळकर, दिनेश भागवत यांनी विशेष सहकार्य केले. असे लोकोपयोगी उपक्रम आम्ही नेहमी राबवित राहू अश्या भावना याप्रसंगी मा.नगरसेवक उदय रसाळ यांनी व्यक्त केल्या.

संतोष दिवाडकर

A health camp and employment fair was held in Kalyan East through Kalyan Vikasini

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलमध्येआंतरराष्ट्रीय वृद्ध- दिन निमित्त आजी-आजोबांसोबत आठवणींना उजाळा

कल्याण : आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्स- ज्यामध्ये लिटल आर्यन प्री-के, आर्य गुरुकुल नांदिवली आणि अंबरनाथ आणि सेंट मेरी हाय, कल्याण यांचा समावेश आहे- यांनी शनिवारी ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन’ हा उत्साहपूर्ण उत्सव साजरा केला. सर्व सहभागींसाठी अतूट आठवणी सोडल्या.

ज्येष्ठांना आदरांजली वाहणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि आदराची भावना जागृत करणे आणि मुले आणि त्यांचे आजी-आजोबा यांच्यातील घट्ट बंधने वाढवणे या उद्देशाने हा कार्यक्रम काळजीपूर्वक आयोजित करण्यात आला होता.

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या हुशार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक विलक्षण कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली. मोहकतेत भर घालत, पालकांनी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले, तरुणपणाचा उत्साह आणि अनुभवाचे बोल यांचा एक आनंददायक मिश्रण तयार केले.

वैद्यकीय शिबिर, आकर्षक खेळ, STEM आव्हाने आणि कला आणि हस्तकला क्रियाकलापांसह विविध प्रकारच्या क्रियाकलापांनी सहभागींची प्रतीक्षा केली. आजी-आजोबांसाठी, एक जिवंत कराओके सत्रासह एक विशेष ट्रीट केली, जे दाखवून देते की वय हा आनंद आणि उत्सवात अडथळा नाही. साप आणि शिडी, पक्ष्यांना खायला घालणे आणि कॅरम यासारख्या क्लासिक खेळांनी आजी-आजोबांना आनंद आणि भूतकाळी जीवनाविषयी असणारी ओढ दिसून आली.

आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यकीय व्यावसायिकांचा उपस्थित वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर, आजी-आजोबांनी त्यांचे मनापासून विचार मांडले, त्यांच्या जीवनाबद्दल खोल भावनिक संबंध आणि कृतज्ञता व्यक्त केली. सर्व उपस्थितांमध्ये त्यांच्या पालकांबद्दल आणि आजी-आजोबांप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करून कार्यक्रमाने आपला उद्देश प्रभावीपणे पूर्ण केला.

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल हे सर्वांगीण शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जे वर्गाच्या पलीकडे विस्तारित आहे, मूल्ये जोपासतात आणि पिढ्यांमधील जोड बांधतात. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन’चा हा उत्सव शाळेच्या त्याच्या विस्तारित कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी केलेल्या समर्पणाचा पुरावा आहे.

संतोष दिवाडकर

Reminisce with grandparents on International Day of the Elderly at Arya Global Group of Schools

केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न

कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे.

आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे. सर्व प्रथम लोकांना या देशात आपले अधिकार समजायला हवेत. देशाचा पाया हा १४० कोटी लोकसंख्येच्या हाती आहे. आपलं घर स्वच्छ असावं असे वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर देश स्वच्छ असावं असं का वाटतं नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात ही जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे, की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर गल्ली स्वच्छ झाला पाहिजे. मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील?

आज केडीएमसी ९ आय प्रभागात झालेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी, शिवसेना युवासेनेचे मधुर म्हात्रे, एल.एल.घुटे, स्वच्छता निरिक्षक मोहन दिघे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, संतोष खामकर उप विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक रोहिदास पाटील व शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १०० कर्मचारी, फेरीवाला संघटनेचे सदस्य सह अनेक समाजसेवक, नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे अभियान चेतना शाळा, बुद्ध विहार, एसार पेट्रोल पंप ते नांदिवली कमान, नांदिवली गाव तलाव, आर्य गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले. या वेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केले आहे की स्वच्छ्ता ही आपली सेवा आहे.

संतोष दिवाडकर

‘Swachhta Hi Seva’ campaign under KDMC 9-I Ward concluded