कल्याण पश्चिम आमदार Vishwanath Bhoir यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन

Vishwanath Bhoir : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पंचवार्षिक विकास कामांच्या अहवालाचा सादरीकरण आणि प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अहवाल प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करतांना पाच वर्षात सहकार्य केले त्याबद्दल माध्यमांचे आभार मानले.

मागील पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीची अडीच वर्ष ही कोव्हिड काळात गेली. तरीदेखील मी थांबलो नाही, तब्बल अडीच वर्षात मी शासनाकडून २०२३ कोटी रुपयांचा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणला असून विकास कामे झपाट्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे भोईर यांनी सांगितले.

आयोजित अहवाल प्रकाशन सोहळ्याला शिवसेनेच्या छाया वाघमारे, उपनेत्या विजया पोटे, नेत्रा उगले, कल्याण जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे, संजय पाटील, प्रभूनाथ भोईर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, टिटवाळा ते कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात आमदारांनी विकास कामांची गंगा आणली, त्यात काँक्रिट रस्ते, नाले, गटार, अंतर्गत रस्ते, पायवाटा, उद्याने सुशोभिकरण तर स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक मोठ्या प्रकल्पांची विकास कामे केली आहेत. आमदारांनी प्रत्येक विभागात आणि प्रभागात न्याय देण्याचे काम केले आहे.

Publication of five year work report of Kalyan West MLA Vishwanath Bhoir

KDMC कर्मचाऱ्यांना दिवाळी Bonus जाहीर; मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

KDMC Bonus : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यंदाच्या दिवाळीत १९,५०० रुपयांचा बोनस जाहीर झाला असून त्यासंदर्भात अनेक कर्मचारी तसेच संघटना मला भेटल्या होत्या, त्या सगळयांचे म्हणणे ऐकून घेत शासनाकडे मांडून त्या सगळ्यांना आता बोनस जाहीर झाला असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बोनस करिता चव्हाण यांनी राज्य सरकारशी चर्चा केली होती. त्यामुळे बोनस दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. यंदा कर्मचाऱ्यांना १९,५०० एवढा बोनस जाहीर करण्यात आला असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना आदेश देण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.

कोविड काळातील पदभरती, २७ गावातील कर्मचारी अशा सगळ्यांनाच बोनस मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दिवाळीपूर्वीच सर्वांना बोनस वितरित होईल असेही ते म्हणाले. महानगरपालिका कर्मचारी वर्ग दरवर्षी भरघोस बोनस मिळावा यासाठी तळमळ व्यक्त करीत असतो. मात्र यंदा जाहीर झालेल्या बोनस नंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Diwali Bonus announced to KDMC employees

विधानसभा निवडणुक तयारीच्या अनुषंगाने भाजप कोअर कमिटीची दिल्लीत बैठक संपन्न; मंत्री रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुक तयारीच्या अनुषंगाने राज्याच्या भाजप कोअर कमिटीची बैठक सोमवारी मुंबईत संपन्न झाली. त्यानंतर दिल्ली मध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री रविंद्र चव्हाण आणि अन्य मंत्री मंडळी व केंद्राच्या कोअर कमिटी समवेत एक बैठक पार पडली. या दोन्ही बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सोमवारी चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आदींनी मार्गदर्शन केले. कोकणच्या दृष्टीने निवडणूक संदर्भात मुद्यांवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली, त्यावर सखोल चर्चा झाली. कोकण पट्ट्यातील ४८ विधानसभांबाबत माहिती देऊन सद्यस्थिती यावेळी सांगण्यात आली.

आयोजित बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे.

BJP core committee meeting concluded in Delhi in connection with assembly election preparations

डोंबिवली मधील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न; मंत्री Ravindra Chavan यांनी केलं संबोधित

Ravindra Chavan : रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री Ravindra Chavan यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला. निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Minister Ravindra Chavan delivered a speech

Kalyan पूर्वेतील Shivsena उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मशाल ठेऊन उचलला धनुष्यबाण

Kalyan Shivsena : कल्याण पूर्वेत नुकतेच शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शिवसेना उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख ल गोपाळ लांडगे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा झेंडा खांद्यावर देऊन त्यांचे पक्षामधे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख सत्यवान खेडेकर, उप विभागप्रमुख व माजी सैनिक संघटना कल्याण शहर अध्यक्ष अनंत आंबरे, उप विभागप्रमुख महेंद्र एटमे, उप शाखाप्रमुख प्रकाश यादव, विकास कदम, राहुल मोरे, महेश नाईक, युवासेनेचे तन्मय एटमे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा देऊन आपला पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल आणि आपणास चांगले काम करण्याची संधी मिळेल आपण त्या संधीचं सोन कराल असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी युवासेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख जितेन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, महिला उप जिल्हासंघटक व माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, महिला विधनसभा संघटक पल्लवी बांदिवडेकर, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, विभागप्रमुख संतोष साळवी, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, वासुदेव कदम, प्रदीप तांबे यांच्यासह कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक/नगरसेविका त्याचबरोबर पक्षाचे असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shivsena UBT party workers from Kalyan East join Shiv Sena

रतन टाटांच्या निधनानंतर आज Namo Ramo Dandiya रास गरबा बंद ठेवण्याच्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

Namo Ramo Dandiya : शहरात सर्वत्र नवरात्रीनिमित्त दांडिया उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाच्या माध्यमातून उत्सव भरवला आहे. दोन्ही ठिकाणी अफाट गर्दी होत असून नवरात्र उत्सवप्रेमी नागरिकांमध्ये त्यामुळे जल्लोष, उत्साहाचे वातावरण आहे.

महायुतीचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आदी मान्यवरांनी काल नमोरमो नवरात्र उत्सवात येऊन देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. मागील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील नमोरमोमध्ये येऊन आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रासरंग नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी जाऊन उत्सवाचा आनंद लुटला होता. एकूणच महायुतीने शहरात सुरू केलेल्या या भव्य उत्सवाची चर्चा राज्यभर सुरू असून सर्व देविभक्तांना त्यातून आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया सहभागी भक्तांमधून व्यक्त झाली.

भारताचे अनमोल रत्न रतन टाटा यांचे रात्रीच्या दरम्यान दुःखद निधन झाले. यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार असून शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार आज शासनाचे कोणतेही सांस्कृतिक अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्या निधनानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा हळहळ केली असून आजच्या दिवशी नमो रमो मध्ये गरबा रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून फक्त देवीची आरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Minister Ravindra Chavan’s instructions to close Namo Ramo Dandiya Ras Garba today after Ratan Tata’s death

Dombivali : थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून भाजी,फळे, कडधान्य उपलब्ध

Dombivali : शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या बाजारपेठेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केला. याच विचाराने शहरात कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात ही ग्राहक पेठ सुरु असणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे. सर्वांचे पोट भरावे यासाठी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळाले, तसेच शहरातील नागरिकांना थेट शेतातील माल खरेदी करता आला तर त्यात दोघांचाही फायदा असल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले.

या संकल्पनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय तसेच नैसर्गिक पद्धतीचा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य आदी जिन्नस रास्त दरात विकत घेता येणार आहेत. नेहरू मैदान येथे नवरात्रीनिमित्त विशेष फ्रुट महोत्सवाच्या रूपाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dombivali : Vegetables, fruits, pulses available from direct farmer to consumer concept

महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

रवींद्र चव्हाण : श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या (भक्त निवास) वास्तूचे भूमिपूजन आज संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या अपर सचिव मनीषा म्हैसकर व अयोध्येचे खासदार व आमदार आदींची विशेष उपस्थिती लाभली.

अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालक राम मंदिरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत अयोध्या नरेश प्रभू श्री राम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते. यावेळी बालक राम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली.

भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनाचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे म्हटले जात असल्याची प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली.

Dombivli News : स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद

Dombivli News : महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामी नारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे अयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.

दोघांनीही स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधीलकी आणि स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्म मध्ये ते स्वतः या विषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मत यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही. तर त्यात सातत्य असायला हवे. त्यातून परिसर स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थित राखले जावे असेही चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण हे आताच नव्हे तर गेली अनेक वर्षे या उपक्रमात येऊन झाडू हातात घेतात. त्यामुळे त्यांचे सहकारीही पुढे सरसावून मदत करतात. या गोष्टीचा आनंद असल्याचे स्वामी नारायण भक्तांनी सांगितले.

Dombivli News : Huge response to Swaminarayan Mandir Sanstha’s cleanliness drive

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पण गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांचे काय? राजेश दाखिनकर यांचा सवाल

अक्षय शिंदे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले. शिवसेनेकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखिल भारतीय सेनेचे पक्ष प्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी यांचे विश्वासू खंदे समर्थक अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख राजेश दाखिनकर यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधक दोघांवरही सवाल उपस्थित केले आहेत.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्या चिमुरड्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे यावेळी राजेश दाखिनकर म्हणाले. जो माणूस मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोण कशी घेऊ शकतो? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात ज्या शाळेत हा प्रकार घडला ते संस्थाचालक राजकीय पक्षाशी संलग्न असून ते सध्या फरार आहेत. त्यांना आतापर्यंत अटक होऊन त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचे उत्तर गृहमंत्री व राज्य सरकारने जनतेला द्यायला हवे. शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे. त्यामुळे या घटनेत आणखीन समाविष्ट असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन व्हायला हवे अशी प्रतिक्रिया राजेश दाखिनकर यांनी एमएच मराठीला दिली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे. ‘शक्ती कायदा’ जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे. त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही अखिल भारतीय सेनेतर्फे करतच आहोत. परंतु इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?

डोंबिवलीत घडलेल्या घटनेत आम्ही महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’ सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. राज्य शासनाने कठोर पावले उचललीच पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला पुरा’ होईल.

– राजेश दाखिनकर
(ठाणे जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय सेना)

Akshay Shinde’s encounter but what about others involved in the crime? Question by Rajesh Dakhinkar