नर्सिंग कोर्सेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; जॉब इंटरव्ह्यूमध्ये उघड झाला प्रकार

कल्याण : नर्सिंग कोर्सच्या नावाखाली कल्याण मध्ये जवळपास ३०-४० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या संदर्भात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षण संस्थे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण मध्ये एक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून मोठी फी उकळून नर्सिंग कोर्स चालवीत होती. आमची संस्था सरकारी नोंदणीकृत संस्था असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर कोर्सचे सर्टिफिकेट देखील देण्यात आले. मात्र हेच सर्टिफिकेट घेऊन विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तेथे त्यांच्यावर खोटे सर्टिफिकेट देऊन इंटरव्ह्यू देत असल्याचे आरोप केले गेले. यानंतर गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना मिळालेलं सर्टिफिकेट हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. या फसवणुकीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि मेहनत वाया गेली असून जवळपास लाखो रुपयांची कमाई या बोगस शिक्षण संस्थेने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू असून विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

संतोष दिवाडकर

Cheating students in the name of nursing courses

शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी

कल्याण : शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख व मा.नगरसेवक निलेश शिंदे यांच्यावर पक्षाने पुढील वर्षभरासाठी नवी जबाबदारी सोपवली आहे. आगामी महानगरपालिका, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेत निलेश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी, शिवाजीनगर व कोथरूड विधानसभा संपर्कप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढील वर्षभरासाठी निलेश शिंदे सदर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पक्षाचा कार्याचा आढावा घेत राहतील.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र निलेश शिंदे यांना देऊन त्यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. निलेश शिंदे यांनी शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पक्षाचे कार्य आजतागायत पुढे नेले आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असोत की गरजूंना मदतीचा हात यामध्ये ते नेहमी एक पाऊल पुढे राहिले आहेत. समाजातील कामकाज तसेच पक्षासाठीचे आतापर्यंतचे योगदान पाहता त्यांना आता विधानसभा क्षेत्रांच्या संपर्कप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मिळालेली नवी जबाबदारी मोठ्या विश्वासाने पार पाडू, तसेच आतापर्यंत पक्षासाठी ज्या उमेदीने काम करीत आलो तसेच काम इथून पुढेही करीत राहणार असल्याच्या भावना यावेळी निलेश शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

संतोष दिवाडकर

Shiv Sena official Nilesh Shinde has a big responsibility from the party

कल्याण पूर्वेत कल्याण विकासिनी मार्फत आरोग्य शिबीर आणि रोजगार मेळावा संपन्न

कल्याण : कल्याण विकासिनी व वीरशैव लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मा.नगरसेवक उदय रसाळ यांच्या मार्फत आरोग्य शिबीर व रोजगार मेळाव्याचे आयोजन आज कल्याण पूर्वेत करण्यात आले होते. कोळसेवाडी प्रभागातील नागरिकांनी या शिबिरात प्राथमिक आरोग्याची तपासणी करून घेतली. यात ECG, ब्लडप्रेशर, हृदय तपासणी, रक्त तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले.

आरोग्य शिबीरा बरोबरच बेरोजगार तरुणांसाठी, मॅजिक बस या संस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईमेंट लिंक स्किलिंग प्रोग्राम च्या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणीची नोंदणी करून घेण्यात आली आहे. रोजगारासाठी आवश्यक स्किल ट्रेनिंग संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. असे ही उदय रसाळ यांनी सांगितले. या शिबिराला असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला.

शिबिरासाठी सहकार्य करणारे डॉ. गुप्ता, वीरशैव लिंगायत समाज कल्याण या संस्थेचे सचिव जितेंद्र लिगाडे, मॅजिक बस चे समन्वयक प्रदीप सोनावणे, कल्याण विकासिनीचे अजित शिंदे, राकेश गायकवाड, गोविंद लहाने, संजय केदारे, अनिल सुरळकर, दिनेश भागवत यांनी विशेष सहकार्य केले. असे लोकोपयोगी उपक्रम आम्ही नेहमी राबवित राहू अश्या भावना याप्रसंगी मा.नगरसेवक उदय रसाळ यांनी व्यक्त केल्या.

संतोष दिवाडकर

A health camp and employment fair was held in Kalyan East through Kalyan Vikasini

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलमध्येआंतरराष्ट्रीय वृद्ध- दिन निमित्त आजी-आजोबांसोबत आठवणींना उजाळा

कल्याण : आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्स- ज्यामध्ये लिटल आर्यन प्री-के, आर्य गुरुकुल नांदिवली आणि अंबरनाथ आणि सेंट मेरी हाय, कल्याण यांचा समावेश आहे- यांनी शनिवारी ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन’ हा उत्साहपूर्ण उत्सव साजरा केला. सर्व सहभागींसाठी अतूट आठवणी सोडल्या.

ज्येष्ठांना आदरांजली वाहणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि आदराची भावना जागृत करणे आणि मुले आणि त्यांचे आजी-आजोबा यांच्यातील घट्ट बंधने वाढवणे या उद्देशाने हा कार्यक्रम काळजीपूर्वक आयोजित करण्यात आला होता.

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या हुशार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक विलक्षण कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली. मोहकतेत भर घालत, पालकांनी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले, तरुणपणाचा उत्साह आणि अनुभवाचे बोल यांचा एक आनंददायक मिश्रण तयार केले.

वैद्यकीय शिबिर, आकर्षक खेळ, STEM आव्हाने आणि कला आणि हस्तकला क्रियाकलापांसह विविध प्रकारच्या क्रियाकलापांनी सहभागींची प्रतीक्षा केली. आजी-आजोबांसाठी, एक जिवंत कराओके सत्रासह एक विशेष ट्रीट केली, जे दाखवून देते की वय हा आनंद आणि उत्सवात अडथळा नाही. साप आणि शिडी, पक्ष्यांना खायला घालणे आणि कॅरम यासारख्या क्लासिक खेळांनी आजी-आजोबांना आनंद आणि भूतकाळी जीवनाविषयी असणारी ओढ दिसून आली.

आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यकीय व्यावसायिकांचा उपस्थित वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर, आजी-आजोबांनी त्यांचे मनापासून विचार मांडले, त्यांच्या जीवनाबद्दल खोल भावनिक संबंध आणि कृतज्ञता व्यक्त केली. सर्व उपस्थितांमध्ये त्यांच्या पालकांबद्दल आणि आजी-आजोबांप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करून कार्यक्रमाने आपला उद्देश प्रभावीपणे पूर्ण केला.

आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल हे सर्वांगीण शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जे वर्गाच्या पलीकडे विस्तारित आहे, मूल्ये जोपासतात आणि पिढ्यांमधील जोड बांधतात. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन’चा हा उत्सव शाळेच्या त्याच्या विस्तारित कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी केलेल्या समर्पणाचा पुरावा आहे.

संतोष दिवाडकर

Reminisce with grandparents on International Day of the Elderly at Arya Global Group of Schools

केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न

कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे.

आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे. सर्व प्रथम लोकांना या देशात आपले अधिकार समजायला हवेत. देशाचा पाया हा १४० कोटी लोकसंख्येच्या हाती आहे. आपलं घर स्वच्छ असावं असे वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर देश स्वच्छ असावं असं का वाटतं नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात ही जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे, की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर गल्ली स्वच्छ झाला पाहिजे. मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील?

आज केडीएमसी ९ आय प्रभागात झालेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी, शिवसेना युवासेनेचे मधुर म्हात्रे, एल.एल.घुटे, स्वच्छता निरिक्षक मोहन दिघे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, संतोष खामकर उप विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक रोहिदास पाटील व शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १०० कर्मचारी, फेरीवाला संघटनेचे सदस्य सह अनेक समाजसेवक, नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे अभियान चेतना शाळा, बुद्ध विहार, एसार पेट्रोल पंप ते नांदिवली कमान, नांदिवली गाव तलाव, आर्य गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले. या वेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केले आहे की स्वच्छ्ता ही आपली सेवा आहे.

संतोष दिवाडकर

‘Swachhta Hi Seva’ campaign under KDMC 9-I Ward concluded

कल्याण पूर्वेच्या गणेश टेकडीचा होणार कायापालट

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ५ ड कार्यालयाच्या मागे असलेल्या टेकडी वरील गणेश मंदिर तसेच टेकडीच्या सुशोभिकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन पूजा पाठ करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गणेश टेकडी कल्याण पूर्व महानगरपालिका ड प्रभागाला लागून आहे. याच टेकडीवर सुमारे दीडशे वर्षांपासून गणपती विराजमान असल्याचे सांगितले जाते. शहरीकरण होण्यापूर्वीच्या कल्याणची साक्ष देणारी नेतीवली प्रमाणेच ही देखील एक टेकडी असल्याचे मानले जाते. मात्र मागील काळात या टेकडीवर अपप्रवृत्तीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले होते. या टेकडीवर अश्लील चाळे, गर्दुल्ल्यांचे अमली पदार्थांचे सेवन, मद्यसेवन, चोरी, लूटमार, परिसरातील लोकांच्या घरावर दगडी मारणे अशा घटना घडत होत्या.

अलिकडल्या काळात गणेश टेकडी आपले रूप पालटत असून मंदिर परिसराचे देखील सुशोभीकरण होणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेकरांसाठी हा परिसर धार्मिक तसेच ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांना या उंच ठिकाणी विरंगुळा मिळणार आहे. कधी नव्हे ते टेकडी परिसर सर्वांसाठी सुरक्षित प्रेक्षणीय स्थळ होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनाही आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

संतोष दिवाडकर

Ganesh hill of Kalyan East will be transformed

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने कोसळली सुरक्षा भिंत; लोकांच्या घरात चिखलाचे साम्राज्य

कल्याण : बुधवारी दुपारच्या दरम्यान कल्याणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्या तसेच पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात गॅस कंपनीच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत पावसाच्या प्रचंड प्रवाहाने कोसळून बाजुला असलेल्या रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसून काही प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

सुमारे ३० वर्ष जुनी असलेल्या मनिष गॅस कंपनीच्या गोडाउनच्या सुरक्षा भिंतीला अचानक पणे पडलेल्या प्रचंड अशा पावसाच्या पाण्याचा प्रवाह असह्य झाल्याने हि भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी आणि चिखल घुसल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. अगदी कमी वेळात हा हाहाकार माजल्याने नागरिक देखील गोंधळून गेले होते.

आज सकाळपासून तहसीलदार व तलाठी कार्यलयामार्फत याठिकाणी पंचनामे करण्यात आले असून त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तां कडून केली जात आहे.

संतोष दिवाडकर

The security wall collapsed due to the flow of rain water

कोकणात हजारो एसटी बसेस तर इतर महाराष्ट्राकडे महामंडळाचे दुर्लक्ष? आरक्षित असलेली एसटी बस केली रद्द

विठ्ठलवाडी : गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी हजारो एसटी बसेस मुंबई तसेच राज्यभरातून मार्गस्थ करण्यात येत आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी जाणाऱ्या काही एसटी बसेस रुद्ध होत असल्याने त्या भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातून शेकडो एसटी बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांमार्फत देखील शेकडो एसटी गाड्या मार्गस्थ केल्या गेल्या. मात्र सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सुटणारी विठ्ठलवाडी गोंदवले ही एसटी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रुद्ध झाल्याची माहिती विठ्ठलवाडी एसटी आगाराकडून प्रवाशांना देण्यात आली. तिकिटासाठी भरलेले पैसे परत मिळतील असे सांगण्यात आले असले तरी फक्त पैसे महत्त्वाचे नसून आमची मोठी गैरसोय झाली असल्याचा संताप प्रवासी व्यक्त करीत आहेत.

गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासाठी नियमीत सुटणाऱ्या व रिजर्वेशन असलेल्या बसेस रुद्ध करणे किती योग्य आहे ? असा सवाल प्रवाशांमार्फत विचारला जात आहे. विठ्ठलवाडी एसटी आगारातून अगदी जेमतेमच गाड्या पुणे सातारा मार्गावर धावतात. त्यातच गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी रुद्ध झाल्याने गणेशोत्सव महाराष्ट्राच्या इतर भागात नसतो का ? असा सवाल एसटी महामंडळाकडे उपस्थित केला जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर एसटी ही सातारा विभागाच्या दहीवडी आगाराची असून त्यांनी ही एसटी रुद्ध केली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दहीवडी आगाराशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. रिजर्वेशन असलेली एसटी बस रुद्ध झाल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करणे ही जबाबदारी एसटी महामंडळाची नाही का? की सर्व सामान्य माणसाला गृहीत धरून मनमौजी कारभार सुरू आहे असा प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत.

संतोष दिवाडकर

ST Corporation’s neglect of other Maharashtra?

Dombivli Building Collapse : आयरे गावात कोसळली इमारत; मलब्यात अडकले दोन रहिवाशी

Dombivli Building Collapse : आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५:४० दरम्यान डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील आदिनाथ बिल्डिंगचा (G+3) काही भाग कोसळला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी क.डों.म.पा. अग्निशमन दलाचे जवान, फायर इंजिन, आपत्ती व्यवस्थापन टीम, TDRF दाखल असून सदर ठिकाणी मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर इमारतीतील नागरिकांना या अगोदर इमारत खाली करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नसून प्रशासन घटनास्थळी कामकाज करीत असून महापालिका आयुक्तांनी देखील प्रत्यक्ष भेट दिली होती. मात्र या इमारतीच्या मलब्यात दोन रहिवासी अडकले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

इमारत खचत असताना रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. मात्र याच इमारतीत राहत असलेले ७० वर्षीय वृद्ध आणि एक ४५ वर्षीय महिला आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. या दोन्ही रहिवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संतोष दिवाडकर

Dombivli Building Collapse : Building collapsed in Ayre village

शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नाही; त्यांनी महापौर बसवण्याची स्वप्न पाहू नये; Raju Patil यांचा टोला आणि त्याला भाजप आमदारांचे समर्थन

Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब बरोबर असल्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण आणि सर्व राजकीय समीकरणे पूर्णपणे फिरली आहेत. आता नेमके मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे निवडणूकीच्या निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यात जरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी कल्याण डोंबिवलीत मात्र या दोन्ही बाजूंमध्ये तू तू मे मे अशीच परिस्थिती पहायला मिळते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. मात्र शहरात भाजपा, शिवसेना, उबाठा गट आणि मनसे या चार पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ पहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा महापौर बसला नसून आता भाजप देखील शिंदे गटा समोर चालत नसून त्यांनी महापौर पदाची वलग्ना करू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला देत त्यांना डिवचले आहे.

राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत असून शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजपचे खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

संतोष दिवाडकर

Raju Patil & Ganpat Gaikwad criticized Shinde